2 दिसंबर 2018

श्रीराम जन्मस्थान निर्मोही आखाडा, रामघाट, अयोध्या यांचे !

 श्रीराम जन्मस्थान मंदिर,रामकोट,अयोध्या {फ़ैजाबाद} उ.प्र.

२३ मार्च १५२८ पूर्वी पासून श्रीराम जन्मभूमी मंदिर व्यवस्थापन-श्री पञ्च रामानंदीय निर्मोही आखाडा, रामघाट, अयोध्या यांचे कडे आहे !             

त्रेतायुगात पृथ्वीच्या उत्तरी गोलार्धावर खगोलिक महाप्लावन (inudation) आलं होत. या महाविनाशात सृष्टीवर मनु आणि काही ऋषी वाचले होते.  महाभारतात म्हटले आहे कि ,"प्लावन पूर्व वेदात म्हटल्यानुसार धर्म म्हणुन नाव "सात्वत धर्म" होता." या धर्माचा प्रचार मनु चे वंश श्राध्ददेव,यांचे पुत्र इक्ष्वाकु ने केला. रामायणात श्रीरामांना इक्ष्वाकु वंशी म्हणुन निरुपित केलं गेलं आहे.प्रभु श्रीराम यांचा जन्म उत्तर कौशलच्या प्रमुख शाखेच्या ३९ व्या पिढीत महाराज दशरथ यांच्या पुत्राच्या रूपात झाला. चैत्र महिन्याची शुक्ल पक्ष नवमी, कर्क लग्न, पुनर्वसु नक्षत्र,माध्यान्ह काळी सुर्य मेष राशीत प्रवेशत असतांना झाला.
कालिदासा ने रघुवंश च्या १६ व्या सर्गात , जानकी हरण चे कवी कुमार दास याने अयोध्येचे सुन्दर वर्णन केलं आहे.
                                                                                                                               
*जैन ग्रंथांत अयोध्येचे वर्णन "तिलक मंजिरी" मध्ये धनपाल नी फार वाढवुन केलं आहे.इक्ष्वाकु वंशी अयोध्या नरेश ऋषभ राय व बाहुबली या दोन भावांत सत्ता संघर्ष झाला परन्तु,बाहुबली ने जैन मताचा स्वीकार केला.काही काळाने ऋषभ राय ने देखील जैन मत स्विकारले. चार तीर्थनकरांची जन्म भूमि अयोध्या होती.

*इक्ष्वाकु कुळाची लिच्छवी शाखा,यात महात्मा बुध्द यांचा जन्म झाला.महात्मा बुध्द यांचे संपुर्ण जीवन कौशल मध्ये व्यतीत झाले,जन्म कपिलवस्तु येथे, मुख्य निवास सरावती,धम्म प्रसार सारनाथ आणि महानिर्वाण कुशीनगर येथे झाले जे कौशल प्रदेश मध्ये होते. भगवान बुध्द राजधानी अयोध्या येथे येण्याचे प्रमाण दन्त धावन कुंड आहे ,किन्तु अयोध्या नगरी ची दशा त्यावेळी उन्नत नव्हती.

 *श्रीराम पुत्रांच्या वंशात गुरु श्री नानकदेव कालूराम बेदी जी आणि गुरुश्री गोबिंदसिंह तेगबहादुर सोढ़ी जी यांचा अविर्भाव झाला,कुशच्या वंशातील कालकेतु ने लवच्या वंशातील कालरायच्या लाहोर वर कब्ज़ा केला तेव्हा निष्कासित कालराय सनौढ़च्या राजाश्रयास गेला.पुढे त्यांचे जावई झाले.कालरायच्या सोढ़ीराय वंशान कालकेतुचे वंशास सत्ताच्युत केलं तेव्हा एक शाखा नेपाळ ला जाऊन शासक राणा झाली. दूसरी शाखा राजस्थानला जाऊन शासक महाराणा म्हणुन ओळखली गेली. तीसरी शाखा वाराणसीत जाऊन चतुर्वेदी झाली जे बेदी म्हणुन गौरवले गेले.चतुर्वेदी यांची ख्याति ऐकुन सोढी यांनी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केलं.त्यांचे ज्ञान, वाणी,बल,तेज यांच्या प्रभावाने पूर्व कालीन चुकींच्या कारणाने पश्चाताप होऊन त्यांना राजसत्ता सोपवुन वनात निघुन गेले.गुरुश्री नानकदेवजी यांचे सुपुत्र बाबा श्रीचंद आणि महाराणा प्रताप यांची हल्दीघाटीत झालेली भेट व ओळख ही एका वंशातील दोन शाखांचे मिलन होते.

 *अलेक्झांडर सिकंदर पंजाबच्या सीमे कडुन आक्रमण करण्यास आला परंतु १२ गणराज्यांनी परस्पर मतभेद बाजूस सारून संयुक्त हल्ला चढवुन परत फिरण्यास विवश केले.त्याच्या पराजयाचे कारण,संघटित शक्ती हे ध्यानात ठेवुन रोमन-कुषाण मिनेंडर ने वैष्णवांच्या एकात्मतेवर प्रहार करण्यासाठी बुध्द मतावलंबी बनण्याचे सोंग पांघरले. मगध सम्राट बृहद्रथ ने त्याच्यावर विश्वास ठेवला नि बिनविरोध प्रवेश मार्ग मोकळा करून दिला. मानव रक्तप्राशी रोमन सैन्याचा आतंक सुरु झाला. स्थानीय बुध्द प्रत्याक्रमण नव्हे तर सहायता करतील या विश्वासाने मिनैडर ने वैष्णव मंदिर उध्वस्त करण्यास प्रारंभ केला. बद्रीनाथ यांची मुर्ती उचकटुन नारद कुंडात फेकली.अयोध्या-मथुरा येथील जन्मस्थान घेरून ध्वस्त केले.
या समस्त घटनांचा दोषी बृहद्रथ आहे म्हणुन त्याचा सेनापति पुष्यमित्रने त्याची हत्या करून रोमनांना पळवुन लावले.विध्वंसीत मंदिर-स्तूप पुन्हा डागडुजी करून उभे केले. दोन वेळा अश्वमेध यज्ञ केला. मिराशी संशोधन मंडळास एका मंदिर शिलालेखात ,"द्विरश्वमेध् याजिना:सेनापते: पुष्यमित्र्स्य षष्ठेन पुत्रेन केतनं कारितं ll " असा संदर्भ मिळाला.उपरोक्त पराजयाच्या कारणाने सर्व हिंदु जाती -पंथ परस्पर मतभेद विसरून संघटित होऊन तीन महीने लढले.तत्पश्चात शुंग वंशीय राजा द्युमत्सेन ने मिनेंडर ला हरवले व ठार केले तरी सुद्धा कुषाणांचे आक्रमण वारंवार होत राहिले.त्यामुळे श्रीराम जन्मस्थानावर मंदिर पुनर्निर्माण करण्यात व्यत्यय येत राहिला.या आक्रमणकारी मिनैडर वर "मिलिंदपन्ह" ग्रंथ लिहिणाऱ्या धम्माचार्यांनी त्याच्या अस्थी मिळविण्यासाठी प्राण गमावून अर्धा हिस्सा मिळविला.

 *इसवी सन पूर्व शत वर्ष महाराजा विक्रमादित्यांचे मोठे बंधु भर्तृहरि ने राज्यसत्ता त्यागुन संन्यास पत्करला ,गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे शिष्य झाले. सम्राट विक्रमादित्य जेव्हा श्रीराम दर्शन करण्यासाठी आले तेव्हा पाहिले सर्व उध्वस्त होते.तेव्हा त्यांनी महाराज कुश द्वारा बनविलेल्या हवेलीचा पाया शोधुन त्यावर विशाल श्रीराम जन्मस्थान हवेली व अन्य ३६० मंदिरांची निर्मिती केली. या स्तंभांचा उल्लेख 'वंशीय प्रबंध' तथा 'लोमस रामायण' मध्ये सापडतात.प्रभु श्रीराम यांची श्यामवर्ण मूर्ति होती त्याची प्राणप्रतिष्ठा राम नवमीस उत्सवपूर्वक केली गेली होती.

इस्लामच्या उद्भवानंतर अनेक आक्रमण बृहत्तर भारतानं झेलली. सन १०२६ सोरटी सोमनाथ मंदिरा वर महमूद गझनवी ने आक्रमण  करून ध्वस्त केलं तर त्याचा भाचा सालार मसूद ने सन १०३२ मध्ये 'सतरखा' (साकेत) जिंकुन अयोध्येवर आक्रमण केलं. श्रीराम जन्मस्थान हवेली (मंदिर) ध्वस्त केल्याने अनेक राजांनी मिळुन त्याला पळवुन लावले.राजा सुहेलदेव पासी याने त्याचा पाठलाग करून सिंधौली-सीतापुर येथे सय्यद सालार मसूद चे "पांच सिपहसालार" ठार केले व तिथेच दफन करून पासी राजा सुहेलदेव,सालार मसूद च्या मागावर निघाला.


मसूद चा चरित्रकार अब्दुर्रहमान चिश्ती ने लिहिलंय , सुहेलदेव ने अनेक राजांना पत्र पाठवली होती, "य़ह मातृभूमी हमारे पूर्वजों की है और यह बालक मसूद हमसे छिनना चाहता है।जितनी तेजी से हो सके आओ,अन्यथा हम अपना देश खो देंगे।" हे पत्र सालारच्या हाती लागलं होत आणि पलायन करण्याच्या तयारीत होता.सुहेलदेव पासी राजाच्या नेतृत्वात लढण्यासाठी १७ राजे सैन्य घेऊन आले. त्यात राय रईब,राय अर्जुन,राम भिखन,राय कनक,राय कल्याण,राय भकरू,राय सबरू,राय वीरबल,जय जयपाल,राय श्रीपाल,राय हरपाल,राय प्रभू,राय देव नारायण और राय नरसिंह आदी पोहोचले.बहराइच पासुन ७ कोस दूर प्रयागपुरच्या निकट घाघरा नदीच्या तटावर महासंग्राम झाला चहूंकडून घेरुन रसद तोडुन घनघोर लढाई नंतर १४ जून १०३३ ला सैयद सालार मसूद मारला गेला.एकेक शिपाई मारला गेला.त्याला जिथे दफन केले त्या बहराइच मधील थडग्यास आता मजार म्हणत मुसलमान धार्मिक प्रतिष्ठा देत आहेत.

 *इस्लामी आक्रमणकाऱ्यांना मारून पळविणाऱ्या गढ़वाल नरेश गोविन्दचन्द्र शैव (कार्यकाळ सन १११४-११५४) ने शरणार्थी व घुसखोर मुसलमानांवर "तुरष्कदंड" (निवासी कर) लावला होता. त्याने बंगाल च्या बुध्द मतावलंबी कुमारदेवीशी विवाह करून भिक्खुंना ६ गाव इनाम दिली ,ब्रह्मदेशातील पेगोंग मध्ये महाबोधि प्रतिकृति मंदिर बनविले होते.आपला सामंत कन्नोज नरेश नयचंदला ८४ कसोटीचे गढ़वाली शिळा पाठवुन अयोध्येत श्रीराम जन्मस्थाना वर  विशाल मंदिर  निर्माण केले होते याचे प्रमाण १८ जुन १९९२ च्या उत्खननातं प्राप्त ३९ अवशेषातील एक २० पंक्ति शिलालेखा मुळे ज्ञात झाले.

*महर्षि बाल्मीकि (रत्नाकर) जी नी प्रभु श्रीरामाच्या अवताराचे महिमामंडन केलं नाही परंतु श्रीराम चरित्र त्यांच्या लिखित काव्याने ओळखले जाते.

स्वामी रामानुज (१४ वी शताब्दि मध्य) यांनी महाविष्णु पूजेची परंपरा मांडली त्यांचे कथित शिष्य

{Ref. 5. Ramananda (Fifteenth century):
Born at Prayag, he was the first great Bhakti saint of North India. He opened the door of Bhakti to all without any distinction of birth, caste, creed or sex. He was a worshipper of Rama and believed in two great principles, namely as perfect love for god and human brotherhood.

Ref.Link http://www.historydiscussion.net/religion/15-famous-saints-of-the-medieval-india/714 }

जगतगुरु श्री रामानंदजी नी अश्या समयी जन्म घेतला होता जेव्हा सनातन धर्म आणि भारतवर्ष विदेशी आक्रमणकार्यां मुळे त्रस्त होऊन आपल्या अस्तित्वासाठी लढत होता. स्वामी रामानंदजी नी सनातन धर्माच्या रक्षणासाठी उत्तर भारतात भक्ती युगाचा आरंभ करून रामभक्ति चे द्वार सर्वांसाठी सुलभ केले. त्यांनी "अनंतानंद, भावानंद, पीपा, सेन, धन्ना, नाभा दास, नरहर्यानंद, सुखानंद, कबीर, रैदास, सुरसरी आणि पदमावती" अश्या बारा लोकांना आपले प्रमुख शिष्य बनविले, त्यांना "द्वादश महाभागवत" नावाने ओळखले जाते.

"रामानंद"जी नी राम नामाचे महात्म्य स्थापित केलं.शास्त्र-शस्त्र युक्त साधु-सन्यास्यांच्या आखाड्यांच्या निर्मितीचा इतिहास १५ व्या शतकातील आहे.जगद्गुरौ श्री रामानंदाचार्यजीं ची  ७०० वी जयंती निमित्ताने श्रीरामानंद शोध संस्थानच्या ३० वे पुष्प स्मृतिग्रंथ स्मरणिकेच्या स्वरूपात प्रस्तुत आहे, पृ.५४३ वरील १२ व्या क्रमात पु.श्री.अनुभवानंदजीचे तसेच  पृ.६९५ वर पु.श्री.बालानन्दजीं चा उल्लेख आहे.याच क्रमात श्री पञ्च रामानंदीय निर्वाणी अखाडा संक्षिप्त इतिहास एवं संविधानाच्या नियम पृ.३ धारा १ मध्ये पाचशे वर्षांपूर्वी अनुभवानंद-बालानन्दजी नी श्री रामानंदीय वैष्णव संप्रदायाच्या विरक्त साधुंच्या तीन अणि (शाखा )
१)निर्वाणी २)निर्मोहि ३)दिगंबर या नावाने तीन आखाडे निर्माण केल्याचे वर्णन आहे. या तीनही आखाड्यांच्या सेवेचे विकेन्द्रीकरण जगद्गुरु श्री रामानंद जी यांनी केलं आहे.

श्री हनुमान गढ़ी -श्री पंच रामानंदीय निर्वाणी आखाड़ा-रामघाट-अयोध्या

श्रीराम जन्मस्थान मंदिर -श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड़ा-रामघाट-अयोध्या

श्री कनक भवन सरकार -श्री पंच रामानंदीय दिगंबर आखाड़ा-रामघाट-अयोध्या


श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे श्री समर्थ रामदास-सज्जनगड हे नागा तसेच संत शिरोमणि ज्ञानेश्वर महाराज यांचे पिता श्री विट्ठल पंत कुलकर्णी बांदा उत्तर भारत येथील दुबे परिवारातील गोस्वामी तुलसीदास,गुरुश्री गोबिंद सिंह यांचे सेनापती बंदा बैरागी ( माधोदास ) ,संत रविदास (रैदास ), कबीरदास यांनी अनुयय केला दीक्षा घेतली.

सन १५०५ मध्ये गुरुश्री नानकदेवजी आपला मुस्लिम शिष्य मरदाना सोबत तसेच पुढे नवम गुरुश्री तेगबहादुरजी सोढ़ी महाराज देखील राम मंदिर दर्शन करण्यासाठी अयोध्येत आले होते.श्रीगुरु गोविंद सिंह यांनी तर मंदिर मुक्त करून देण्यात योगदान दिलंय.

                                                         

*सन १५२५ महाराणा सांगा (संग्रामसिंह) ला हरवुन बाबर देहलीत तख़्तशिन झाला,सन १५२८ दल-बल सहित अयोध्या निकट सेखा-घागरा संगमावर डेरा टाकला होता.फकीर फजल अब्बास कलंदर आणि मूसा आशिकान कडे दुआ मागण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी श्रीराम जन्मस्थानी मस्जिद बांधल्यावर दुआ करण्याची अट घातली.बाबराने मीर बांकीला हुकुमनामा घेऊन दल-बल सहित पाठवले.पण श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा महंत श्यामानंद यांनी कब्जा सोडला नाही. १७ दिवस चाललेल्या युध्दात हिंदु वीरांचा पराजय झाला १,७२,००० लोकं मारली गेली निर्मोही आखाड्याचे महंत श्यामानंद नी मुर्त्या शरयु नदीच्या लक्ष्मण घाटाखाली लपवुन ठेवल्या.मीर बांकी जेव्हा मंदिरात आला तेव्हा श्यामानंद ने त्याला अडविले.मीर बांकीने श्यामानंद यांचे शिर धडा वेगळे करून गर्भगृहात प्रवेश केला मुर्त्या नसल्याचे पाहून मंदिर तोफा लाउन पाडले. (कालांतराने त्या मुर्त्या तामिळ यात्रेकरूंच्या हाती लागल्या त्या स्वर्गद्वार मंदिरात प्रतिष्ठित आहेत.)

श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे नागा समर्थ श्री रामदास यांनी श्री मत दासबोध ,मनाचे श्लोक आदि प्रापंचिक मनुष्य प्राण्यास उपयुक्त ग्रंथ लिहिलेत तर ,
गोस्वामी श्री तुलसीदास महाराज यांचा परिचय श्रीराम चरित मानस चे रचयिता म्हणुन सर्व दूर ख्याति प्राप्त आहे.
यमुनेच्या दक्षिण तीरावर बांदा जिल्ह्याच्या राजापुर ग्रामात त्यांचा आविर्भाव श्रीमान आत्माराम दुबे यांच्या कुळात मूळ नक्षत्रावर सन १५३१ साली झाला. परिवार त्यागुन बैराग्यांत राहुन राम कथा श्रवण करीत.शुकर क्षेत्रात रामानन्दीय निर्मोही आखाड्याचे महंत श्री नरहरी जीं चे सान्निध्य प्राप्त करून त्यांच्या कडुन दीक्षा घेऊन बारा वर्ष अध्ययन केले श्री रामभोला आत्माराम दुबे यांचे पांडित्य पाहुन श्रीमान दीनबंधु पाठक यांनी आपली कन्या रत्नावली सोबत विवाह लाउन दिला त्यांच्या पुत्राचे नाव तारक !

पत्नीच्या प्रेरणे ने विरक्त होऊन परिवारा पासुन दूर राहत श्रीराम चिंतन करीत काशीला पोहोचले.तिथे रामानंदीय दीक्षा घेऊन आदेशानुसार श्री अयोध्या पुरी गाठली.रामकोट-अयोध्येत निर्मोही आखाड्यात श्रीराम जन्मस्थानी विश्राम करीत असतांना स्वप्नात प्रभु श्रीराम जीं नी संस्कृत वाल्मिकी रामायण अवधी मध्ये करण्याची आज्ञा केली.सन १५७४ चैत्र श्रीराम नवमी स हे कार्य आरंभ झाले.अयोध्येत राहण्याची इच्छा असतांना देखील श्रीराम जन्मस्थान विषयक वारंवार उद्भवणारे सांप्रदायिक विवाद-युद्ध यामुळे काशीत अस्सी घाटावर आले.येथे श्रीराम भक्त हनुमान अश्वत्थ वृक्षावर बसुन रचना ऐकत असत.तिथेच त्यांना दर्शन ही दिले.

देहली त मुग़ल बादशाह अकबर चा कार्यकाल संपल्यावर जहाँगीरच्या कार्यकाळात श्रीराम चरितमानस पुर्णत्वास गेलं.राजा टोडरमल, महाराजा जयसिंग जयपुर व अब्दुलरहीम खान त्यांच्या श्रीराम भक्ति ने अधिक प्रभावित झाले.आणि त्यांच्या सहकार्याने उत्तर भारतात श्रीराम चरितमानस विस्तारित होण्यास वेग मिळाला.
    मानस च्या अतिरिक्त तुसलीदास जी नी रामलला नहछु,वैराग्य संदीपनी,छंदावली रामायण,जानकी मंगल,पार्वती मंगल,श्रीराम सगुणावली,दोहावली, गीतरामायण, कडरवा-रामायण,कृष्ण गीतावली,विनय पत्रिका,हनुमान चालीसा,असे अनेक व्रज-अवधी भाषेत ग्रंथ लिहिले जे विश्व विख्यात आहेत.

त्यांच्या दोहा शतकाच्या अंतिम चरणात श्रीराम जन्मस्थान मंदिर विध्वंस वर्णन आहे.
.
संतश्री गोस्वामी तुलसीदास यांनी "दोहा शतक" सन १५९० मध्ये लिहिले.यातील आठ दोहे (८५ ते ९२) राम जन्मस्थान विध्वंसाचे स्पष्ट वर्णन करतात. हे रायबरेली चे (तलाठी) तालुकदार राय बहादुर बाबू सिंह जी यांनी १९४४ साली प्रकाशित केलं.ते राम जंत्रालय प्रेस मध्ये छापले गेले.याची एक प्रत जौनपुर च्या  शांदिखुर्द गावात उपलब्ध होती त्यावरून पुढे गीताप्रेस ने प्रकाशित केलं.

इलाहाबाद (प्रयागराज ) उच्च न्यायालयात श्रीराम जन्मभूमी विषयक वाद सुरु झाला तेव्हा चित्रकुट येथील अंध कथावाचक श्री रामभद्राचार्य जी यांना Indian Evidence Act अंतर्गत एक expert witness म्हणुन बोलाविले गेले.त्यांनी स्पष्ट केलं कि, "हे सत्य आहे कि श्री रामचरित मानस मध्ये या घटने चा उल्लेख नाही परंतु तुलसीदास जी नी याचे वर्णन आपली अन्य कृति 'तुलसी दोहा शतक' मध्ये केलेलं आहे.जे श्री रामचरित मानस पेक्षा कमी प्रचलित आहे.
अर्थात हे म्हणणं चुकीचे आहे कि तुलसीदास जी नी जे , बाबरच्या समकालीन पण असतांना , श्रीराम जन्मस्थान मंदिर तोडले जाण्याच्या घटनेचे वर्णन नाही केले. हां, जिथे श्रीराम चरितमानस ची चर्चा होत आहे त्यात कुठे ही मुगल वा मंदिर विध्वंसाची घटना नोंदलेली नाही.याचा अर्थ असा नाही कि,गोस्वामी तुलसीदास यांच्या वेळी मुगल नव्हते !"

गोस्वामी तुलसीदास यांच्या 'तुलसी दोहा शतक' काव्य पुस्तकात याचा स्पष्ट उल्लेख आहे कि,श्रीराम जन्मस्थान मंदिर कसे तोडले गेले.

मंत्र उपनिषद ब्रह्माण्हू बहु पुराण इतिहास।

जवन जराए रोष भरी करी तुलसी परिहास।।

सिखा सूत्र से हीन करी, बल ते हिन्दू लोग।

भमरी भगाए देश ते, तुलसी कठिन कुयोग।।

सम्बत सर वसु बाण नभ, ग्रीष्म ऋतू अनुमानि।

तुलसी अवधहि जड़ जवन, अनरथ किये अनमानि।।

रामजनम महीन मंदिरहिं, तोरी मसीत बनाए।

जवहि बहु हिंदुन हते, तुलसी किन्ही हाय।।

दल्यो मीरबाकी अवध मंदिर राम समाज।

तुलसी ह्रदय हति, त्राहि त्राहि रघुराज।।

रामजनम मंदिर जहँ, लसत अवध के बीच।

तुलसी रची मसीत तहँ, मीरबांकी खाल नीच।।

रामायण घरी घंट जहन, श्रुति पुराण उपखान।

तुलसी जवन अजान तहँ, कइयों कुरान अजान।।
+++++++++++++++++++++++++
.

दोहा अर्थ सहित

(१) राम जनम महि मंदरहिं, तोरि मसीत बनाय ।

जवहिं बहुत हिन्दू हते, तुलसी किन्ही हाय ॥

जन्मभूमि वरील मंदिर ध्वस्त करून त्यांनी एक मशीद बनवली.त्याच बरोबर त्यांनी तेज गतीने खुप हिंदूंची हत्या केली.हा विचार मनात येताच तुलसीदास शोकाकुल झाले.

(२) दल्यो मीरबाकी अवध मन्दिर रामसमाज ।

तुलसी रोवत ह्रदय हति हति त्राहि त्राहि रघुराज ॥

मीरबकी नी मंदिर तसेच रामसमाज (राम दरबारच्या मुर्त्या) नष्ट केल्या.रामापाशी रक्षणाची याचना करीत विदिर्ण ह्रदय तुलसीदास रडले.

(३) राम जनम मन्दिर जहाँ तसत अवध के बीच ।

तुलसी रची मसीत तहँ मीरबाकी खाल नीच ॥

तुलसीदास जी सांगताहेत कि अयोध्येच्या मध्य जिथे राम मंदिर होत.तिथे नीच मीरबाकी ने मस्जिद बनवली.

(४) रामायन घरि घट जँह, श्रुति पुरान उपखान ।

तुलसी जवन अजान तँह, कइयों कुरान अज़ान ॥

श्री तुलसीदास जी सांगताहे कि जिथे रामायण, श्रुति, वेद, पुराण शी संबंधित प्रवचन होत  होते, घण्टे, घड़ियाल वाजत असत, तिथे अज्ञानी यवनांची कुरआन आणि अज़ान होऊ लागली.

(५) मन्त्र उपनिषद ब्राह्मनहुँ बहु पुरान इतिहास ।

जवन जराये रोष भरि करि तुलसी परिहास ॥

श्री तुलसीदास जी सांगताहेत कि,क्रोधाने ओतप्रोत यवनांनी खुप काही मंत्र (संहिता), उपनिषद, ब्राह्मणग्रंथ ( जे वेदांचे अंग असतात) तसेच पुराण आणि इतिहास संबंधित ग्रंथांचा उपहास करीत जाळुन टाकले !

(६) सिखा सूत्र से हीन करि बल ते हिन्दू लोग ।

भमरि भगाये देश ते तुलसी कठिन कुजोग ॥

श्री तुलसीदास जी सांगताहेत कि,बळपूर्वक हिंदूंच्या शिखा (शेंडी ) व यज्ञोपवित (जानवे) रहित करून त्यांना गृहविहीन करून आपल्या पैतृक स्थानावरून पळवुन लावले.

(७) बाबर बर्बर आइके कर लीन्हे करवाल ।

हने पचारि पचारि जन जन तुलसी काल कराल ॥

श्री तुलसीदास जी सांगताहेत कि,हातात तलवार घेवुन बर्बर बाबर आला आणि लोकांना आवाहन करीत करीत हत्या केल्या.हा काळ अत्यंत भीषण होता.

(८) सम्बत सर वसु बान नभ ग्रीष्म ऋतु अनुमानि ।

तुलसी अवधहिं जड़ जवन अनरथ किये अनखानि ॥

( या दोह्यात ज्योतिषीय काल गणनेत अंक लिहिले आहेत., सर (शर) = ५, वसु = ८, बान (बाण) = ५, नभ = १ अर्थात विक्रम संवत १५८५ यातुन ५७ वर्ष कमी केले कि, ईस्वी सन १५२८ येत ! )

श्री तुलसीदास जी सांगतात कि,विक्रम संवत १५८५  (सन १५२८) अनुमानतः ग्रीष्म काळात यवनांनी अवध मध्ये वर्णनातीत अनर्थ केले !

आता हे स्पष्ट झाले आहे कि गोस्वामी तुलसीदासजीं च्या या रचनांत श्रीराम जन्मभूमी विध्वंसाचे विस्तृत वर्णन केलेलं आहे.
आता काही ग्रंथ संदर्भ पाहु
१) ऑस्ट्रेलियन मिशनरी जोसेफ टायफेंथालेर ने सन १७६६-१७७१ अयोध्या प्रवास करून परतल्यावर १७८५ मध्ये लिहिलेल्या "हिस्ट्री अन जोग्राफी इंडिया" ग्रंथात पृ.२३५-२५४ वर लिहिलेल्या संदर्भानुसार,"बाबरने राम जन्मभूमि स्थित मंदिर ध्वस्त करीत मस्जिद बनविण्याचा प्रयत्न केला.त्यात मंदिराच्या ढिगार्यातून निघालेल ८४ कसोटीच्या स्तंभांचा उपयोग केला.मुसलमानांशी लढून हिंदू तिथे पूजा अर्चना करतात व राम चबुतऱ्यावर प्रदक्षिणा घालतात !"

२) १६०८-१६११ भारत भ्रमणासाठी आलेल्या विल्यम फिंचच्या  "अर्ली ट्रेवल्स इन इंडिया" च्या पृ.क्र .१७६ वर रामफोर्ट-रानिचंडचा उल्लेख आहे.

३) "गैझेटियर ऑफ़ दी टेरीटरिज अंडर गव्हर्मेंट ऑफ़ इस्ट इंडिया" चे.लेखक एडवर्ड थोर्नटन पृ.क्र.७३९-४० वर १८५४ मध्ये लिहितो,"बाबर ने मशिदी साठी मंदिर पाडुन त्याच्या ढिगातून १४ स्तंभ निवडून लावले !"

४) इनसाय्क्लोपीडिया ऑफ़ इंडिया १८५७ मध्ये एडवर्ड बाल्फोअर याने लिहिलंय,"राम जन्मस्थान,स्वर गडवार,माता का ठाकुर ३ मंदिर पाडुन मशीद उभी केली गेली !"

५) "हिस्टोरिकल स्केच ऑफ़ फ़ैजाबाद' ले. कार्नेजी १८७० लिहितोय ,"राम मंदिरात काळे वजनदार स्तंभ होते त्यावर सुंदर नक्षिकाम केलेलं होत मंदिर पाडल्यावर पुन्हा बांधतांना मशिदीत लावले गेले !"

६) गैझिटियर ऑफ़ दी डाविन्स अवध -१८७७,बाबर ने १५२८ मध्ये मंदिर पाडुन मशिद बनवली !

७) पर्शियन ग्रन्थ "हदीका इ शहादा" ले.मिर्जा जान १८५६ लखनऊ पृ.७,"मथुरा,वाराणसी, अयोध्येत हिंदु श्रद्धा-आस्था जोडलेल्या आहेत.त्यांना बाबराच्या आदेशाने ध्वस्त करून मशिदी बनविल्या गेल्या. "

८) ब्रिटिश नियुक्त जन्मभूमि व्यवस्थापक मौलवी अब्दुल करीम लिखित "ग़ुमइश्ते हालात इ अयोध्या" मध्ये मान्य केलंय कि,"मंदिरे पाडुन त्यावर मशिदी उभारल्या गेल्या !"
९) अकबरनामा "आइन ए अवध" अब्दुल फाजल १५९८ व अन्य अनेक लेखक एकच विचार मांडतांना दिसतात.

बाबर ने मीर बांकी सोबत पाठवलेला हुकुमनाम श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा महंत श्यामानंद यांनी कब्जा सोडला नाही तेव्हा त्यांची हत्या करून वास्तु उभी करीत असतांना २ वर्ष युध्द सुरूच होते. हंसबर नरेश रणविजयसिंह,महाराणी जयराज कुमारी त्यांचे राजगुरु पं.देवीदीन पाण्डेय यांच्या बलिदानाच्या मध्य काळात स्वामी महेशानंद साधुसेना घेऊन लढले.
मस्जिद बनवीत असतांना जितकी भिंत दिवस भरात उभी राही तितकी रात्री धडाडून पडत होती.तेव्हा बाबराने निर्मोही संतांचा सल्ला घेतला.साधुंच्या भजन-किर्तनासाठी सभागृह उभारले.मिनार तोडून टाकले.वजू साठी हौद किंवा जलाशय बनविले नाही.प्रदक्षिणा मार्ग बनवला. मुख्य द्वारावर "सीता पाकस्थान" लिहायला लावले,छतात चंदनाची लाकडं टाकली !                                         
अकबराचा कार्यकाळ सन १५५६-१६०६ रामानंदीय निर्मोही आखाडा स्वामी बलरामाचार्यजीं नी २० वेळा लढुन श्रीराम जन्मस्थानाचा कब्जा कायम ठेवला(आईने अकबरी)
अकबर ने बीरबल आणि टोडरमल यांच्या मध्यस्थीने चबुतरा बनवुन देऊन त्यावर छोटे प्रतीकात्मक राम मंदिर बनविले.
औरंगजेब कार्यकाळ सन १६५८-१७०७ हिंदूंनी ३० वेळा लढुन कब्जा राखला ! छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्मोही आखाडा नागा समर्थ श्री रामदास यांच्या सांगण्या वरून एक वेळ राम जन्मस्थान मुक्त केल्याचे पुरावे निर्मोही आखाड्यात असुन मूळ जयपुर येथील ग्रंथात सापडते.
सन १६८० सैयद हसन अली च्या नेतृत्वात पन्नास हजार सैन्य येऊन उभे राहिले तेव्हा कुंभ पर्वावर गुरुश्री गोबिंद सिंह ब्रह्मकुंडावर थांबले होते.निर्मोही बाबा वैष्णवदास जीं नी त्यांची भेट घेऊन व्यथा सांगितली.जेव्हा काश्मिरी पंडित कृपाराम यांच्या नेतृत्वात पाच हजार चिमटाधारी साधुसेने ने हसन अली ला ठार मारून राम जन्मस्थान संकट परतवले ! (आलमगीरनामा पृ.६२३)
सन १६८४ रमजान ची तरिख २४ शाही फौजे ने पुन्हा हल्ला केला. कुंवर गोपालसिंह,ठा.जगदम्बासिंह ,ठा.गजराजसिंह यांनी खुप लढाई लढली.दहा हजार हिंदू मारले गेले त्यांची प्रेते कंदर्प कुपात टाकुन त्याच्या चारी बाजुंनी भिंती उभ्या केल्या गेल्या.मंदिराच्या समोर पुर्वेला हे स्थळ 'गज शाहिदा ' नावाने ओळखले जात असे.
लखनऊ नबाब सआदत अली खा कार्यकाळ सन १७७०-१८१४ या दरम्यान अमेटी नरेश गुरुदत्तसिंह आणि पिपरा चे राजकुमारसिंह यांनी ५ वेळा हल्ले करून मंदिर मुक्त करून श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्यास सोपविले.
नसीरुद्दीन हैदरच्या सन १८३६ पर्यंत च्या कार्यकाळात मकरही नरेश नी ३ वेळा हल्ला चढवून मंदिर सुरक्षित केले.
लखनऊ चा नबाब वाजिद अली शाहच्या सन १८४७-५७ कार्यकाळात दोनदा श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे महंत बाबा उध्दवदास आणि बाबा रामचरणदास यांनी गोंडा नरेश देविबक्षसिंह यांच्या सहकार्याने मंदिर परत मिळवले.
सन १८५७ स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमी वर सन १८५५ हरिद्वार कुंभ पर्वात स्वामी पूर्णानंद (दस्सा बाबा), ओमानंद, अन्ध्स्वामी विरजानंद,मूलशंकर (दयानंद सरस्वती) यांनी देहली नबाब बहादुर शाहच्या नेतृत्वात ३१ मे १८५५ मध्यरात्री लाल किल्ल्यावर स्वर्णपन्ना ध्वज फडकवुन संघर्षाचा शंखनाद केला होता. परिणाम स्वरुप अयोध्या नरेश मानसिंह यांच्या सांगण्यावरून वाजिद अली ने श्रीराम जन्मस्थाना वर परत चबुतरा उभा करण्याची अनुमती दिली.चबुतऱ्यावर तीन फुटाची खास (वाळा) ची सावली बनवून प्रतीकात्मक मंदिरात पूजा सुरु झाली.आमिर अली नी वाजिद अली आणि श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे बाबा रामचरणदास यांच्यात मध्यस्थता घडवुन श्रीराम जन्मस्थाना वर मशीद नसल्याची घोषणा करवली.हा काळ ब्रिटिश सरकार विरुद्ध एकवटलेला भारतीयांचा संघर्ष असल्याने ब्रिटिश सरकार या सलोख्या विरुद्ध होते.त्यांनी बाबा रामचरण दास व आमिर ला नया घाट -अयोध्या येथे ज्या झाडावर फाशी दिली ते आहे.वाजिद अली ला बंदी बनवले.राम जन्मस्थान मंदिर व्यवस्थापन अब्दुल करीम ( ज्याने "गुम इष्ते हालात" लिहिलंय ) ला सोपवले.त्याने देखील हे मंदिर असल्याचे स्वीकारलंय.                                                                                               

ब्रिटिशांनी राजकीय उद्देशाने हिंदू-मुस्लिम एकोपा होऊ दिला नाही.  मो.अजगर ला उकसवुन श्रीराम जन्मस्थानाच्या भिंतीत दरवाजा काढुन मागे मैदानात जाण्याचे आवेदन करायला सांगितले. त्याने याचिका देताच ब्रिटिशांनी मान्यता दिली दिनांक १३ डिसेंबर १८७७ ला हा विवाद ब्रिटिश आयुक्ता कडे गेला श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा महंत खेमदासजीं नी विरोध केला परंतु,ब्रिटिश कुटनीती जिंकली.आता गंमत पहा,मंदिरातुन मागे गेल्यावर मैदानात गेल्यावर नमाज साठी मंदिराच्या मागील भितीला लागुन इबादतगाह सारखी भिंत उभारली गेली.पूर्वे कडे तोंड करून नमाज करता येईना नि या भिंती कडे पाठ करून ही करता येईना.ही भिंत १९१२ दंग्यात पडली तरी पुन्हा ब्रिटिशांनी उभारली व ४/ ५ नमाजी मंदिराच्या व्हरांड्यात उभी राहू लागली

ब्रिटिश प्रथम पुरातत्वविद कनिंगहम द्वारा १८८१-८२ मध्ये श्रीराम जन्मस्थान मंदिरात शिलालेख लावला गेल्याने विवाद चिघळला.निर्मोही आखाड्याचा विरोध ब्रिटिशांनी हाणुन पाडला. त्यामुळे १९ जानेवारी १८८५ रोजी फ़ैजाबाद कनिष्ठ न्यायलयात निर्मोही आखाडा महंत श्री रघुबरदास जी यांनी चबुतऱ्यावर छत टाकण्याची अनुमती मागितली जी धुडकाऊन लावल्यावर जिल्हा न्यायालयात दिवाणी वाद क्र.१७/१८८५ प्रस्तुत केला;न्या.कर्नल एम्.इ.ए.चामियार ने राम जन्मस्थान मंदिर परिसरात पाहणी ची नौटंकी करित पूर्व निर्णय स्थिर ठेवला.त्यामुळे दिनांक १८ मार्च १८८६ ला कमिश्नर ऑफ़ डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये अभ्यर्थना (अपील) केलं..न्या.डब्ल्यू.यंग ने इतिहासात न डोकावता "विवादित स्थल-मस्जिद द जन्मस्थान" शेरा मारून दावा निरस्त -रद्द केला.मात्र यामुळे मशिद हा शब्द रूढ झाला !
सन १९१२ साधू आणि जागृत हिंदूंच्या संयुक्त आंदोलनात दंगा भडकला आणि विवादित वास्तु पडली. त्याची डागडुजी ब्रिटिशांनी १९२१ नंतर केली. २७ मार्च १९३४ गो हत्या पश्चात् उसळलेल्या दंग्यात हिंदु महासभाईंनी ३ गो वधी ठार मारले.मंदिर क्षतिग्रस्त झाले,.फ़ैजाबाद (अयोध्या) डेप्युटी कमिश्नर निकल्सनने पुन्हा डागडुजी केली नि हत्येच्या आरोपींना सोडून दिले.
२७ जुलै १९३७ च्या नवजीवन मध्ये बेरिस्टर गांधी नी रामगोपाल शरद ला लिहिलंय कि,"मुग़ल शासको ने अनेक हिन्दू धार्मिक स्थानों पर कब्ज़ा किया,लुटा या नष्ट कर मस्जिद का रूप दे दिया,मंदिर-मस्जिद में भेद नहीं परन्तु हिन्दू-मुस्लिम पूजा परंपरा भिन्न है,जहा ऐसे कांड हुए है वे धार्मिक गुलामी के चिन्ह है.दोनों पक्षो को मेलजोल कर आपसी कब्जे के मंदिर-मस्जिद वापस लौटा देने चाहिए,इससे भेदभाव ख़त्म होगा और एकता बढ़ेगी."गांधींच्या आदेशाचा प्रभाव असा झाला कि,देहली तील फतेहपुरी मशिदीची ब्रिटिश सरकार द्वारा होऊ घातलेली निलामी एका हिंदु सद्गुण विकृती ने घेतली व मुसलमानांना इबादत साठी परत केली !
१९३५ सांप्रदायिक निर्णय,संविधान विरोधात हिन्दू महासभा प्रिवी कौन्सिल-लंडन पर्यंत लढली पण काँग्रेस तटस्थ राहिल्याने लागु झाला.वक्फ बोर्ड गठीत झाला,अल्पसंख्यांक संज्ञा लागु झाली.सन १९३६ वक्फ बोर्डाचे विधान बनले परंतु श्रीराम जन्मस्थान कधी वक्फ ची संपत्ती नाही झाली. १६ सप्टेंबर १९३८ फ़ैजाबाद जिला वक्फ आयुक्त नी वास्तुचे सरकारी व्यवस्थापक सै.महम्मद झाकी शिया च्या कथनानुसार ,'इस विवादित वास्तु में मुस्लमान नमाज पढ़ने के इच्छुक नहीं,इस्लाम की मान्यता के अनुसार मंदिर को पाक नहीं मानते.' लिहिलंय !

या दरम्यान लाहोरच्या शहिदगंज साहिब गुरुद्वारास अकाली नेता मास्टर तारासिंह आणि वायव्य सरहद प्रान्त हिन्दू महासभा अध्यक्ष राय बहादुर बद्रीदास यांनी प्रिवी कौन्सिल लंडन मध्ये लढुन ३ न्यायाधिश पीठ शीख,मुस्लिम,ब्रिटिश (ख्रिश्चन) समोर वास्तविकता मांडली. न्यायमूर्ति दिन मोहमद नी ९० वर्ष चाललेल्या विवादानंतर दिनांक २ मे १९४० ला गुरुद्वारा साहिब हिंदूंना सोपवला.

  १४ जुलै १९४१ फ़ैजाबाद नजुल विभागात श्रीराम जन्मभूमि मंदिर-परिसर,रामकोट अयोध्या ६७.७७ एकर भूमी, प्लाट क्र.५८३ ने पंजीकृत करीत,
वर्णन- "तीन गुंबद मंदिर" कब्ज़ा-श्री पञ्च रामानंदीय निर्मोही अखाडा महंत श्री राम रघुनाथ दास, पुजारी श्री रामसकल दास,,महंत श्री रामसुभग दास असे लिहिल्याची नोंद आहे. सन १९४४ च्या उ.प्र.गैझेट मध्ये ,'शिया वा सुन्नी मुसलमान किंवा वक्फ बोर्ड नी  "मस्जिद द जन्मस्थान" व्यवस्थापनात कोणतीही रुची दाखवली नाही ! असं लिहिलंय.
१४ ऑगस्ट १९४७ च्या विभाजना नंतर ही हिंदु विवादित धार्मिक स्थळ "जैसे थे !" म्हणत ब्रिटिश राजकारणाची परिपाठी सुरु राहिली.या दरम्यान दिनांक १९ मार्च १९४९ ला श्रीराम जन्मस्थान, फ़ैजाबाद (अयोध्या) "श्री पंच रामानंद निर्मोही आखाड़ा पंजीकृत न्यास" रजिस्टर्ड झाला व आखाड्याचे १५ पंच ट्रस्टी !

श्रीराम जन्मभूमि ले.राधेशाम शुक्ल १९८५ मधु प्रकाशन,५९०,रामकोट अयोध्या ग्रंथा वरून निम्नलेखन साभार

श्रीराम जन्मस्थान मंदिर तर होत परंतु कलंकमुक्त नव्हते ! त्यामुळे अयोध्यावासी प्रक्षुब्ध होते.
फ़ैजाबाद मंडल हिन्दू महासभा प्रायोजित एक सार्वजानिक सभा श्री हनुमान गढ़ी,अयोध्या महंत श्री रामदास यांच्या अध्यक्षतेत झाली.,'श्रीराम जन्मस्थान मंदिरावर अधिकार प्राप्त करण्याचा संकल्प केला गेला.कारण विभाजनोत्तर अल्पसंख्यांक समस्या जशीच्या तशी शिल्लक होती.मुजोरी वाढली होती मुसलमान पायताण घालुन मंदिरात कुरापत काढण्यासाठी येत.मग कधी बलपूर्वक रोखावे लागत होते.याची तक्रार त्यांनी स्थानीय पोलिसांत केली.त्यामुळे डेप्युटी कमिश्नर फ़ैजाबाद रामकेरसिंह यांनी फ़ैजाबाद (अयोध्या) जिल्हा हिंदु महासभा मंत्री ठा.गोपालसिंह विशारादजी,राम चबूतरा मंदिर पुजारी बाबा गोविन्द दास, हिं.म.स.अयोध्या नगर संयुक्तमंत्री बाबा सत्यनारायण दास,बाबा यदुनंदन दास,बाबा राम टहल दास यांना बंदी बनवले.गोपालसिंह जी नी उपोषण आरंभ करताच अयोध्या नगरीत हरताळ सुरु झाला.दुसऱ्या दिवशी बाबु प्रियदत्तरामजी रामकेरसिंह ना भेटले तेव्हा तिसऱ्या दिवशी सर्व मुक्त झाले."राम जन्मभूमि प्रांगणात पायताण घालुन परिसरात प्रवेश निर्बंधांचा फलक अनावरण झाल्याने उत्साह वर्धन झाले.
गांधी वधाचा आंदोलनावर परिणाम झाला.हिन्दू महासभा आणि हिन्दू महासभे च्या गर्भातुन जन्मलेले काँग्रेस धार्जिणे देखील बंदी बनविले गेले.अयोध्येत ही त्याचा प्रभाव दिसला.२२ मे १९४८ ला ठाकुर गोपालसिंह,लक्ष्मण शास्त्री अन्य मुक्त होई पर्यंत जन जागृति बंद राहिली.
    
ऑक्टोबर.१९४९ अयोध्येत राजवाड्या समोर उ.प्र.वि.स.अध्यक्ष गोविंद सहाय यांच्या जनसभेत अयोध्या नगर हिं.म.स.मंत्री ब्रहमलीन परमहंस महंत रामचंद्रदास जी महाराज दिगंबर अखाडा;हिंदू महासभा प्रचारक बाबा अभिरामदास;हिंदू महासभा जिल्हा मंत्री ठा.गोपालसिंह विशारद ;जिला संयुक्त मंत्री पं.लक्ष्मण शास्त्री;महाराजा इंटर कोलेज प्रा.पं.भगीरथप्रसाद त्रिपाठी तसेच नगरजन उपस्थित होते.बाबा अभिरामदास,परमहंस रामचंद्रदास जी सभेत उभे राहून श्रीराम जन्मस्थान विषयी बोलण्याचा आग्रह केला.गोंधळ सुरु झाल्यावर सहाय जनसभा सोडून पळून गेले.हिंदू महासभाईंनी मंचाचा कब्जा घेऊन हनुमान गढी महंत श्री रामदास यांच्या अध्यक्षतेत "प्राचीन कालसे रामजन्म भूमि हमारी है ! हमारे मर्यादा पुरुषोत्तम की चिरंतर जन्मभूमि है ! उसपर लुटेरे आक्रांताओने  अमानवीय बल पर कब्ज़ा किया है,आज हिंदुस्थान  स्वतंत्र है.इसलिए यह जन्मभूमि हमें अविलम्ब वापस की जाये !" असा प्रस्ताव ठेऊन  प्रशासनिक अधिकारी, विधानसभा सदस्यांना पाठवुन दिला.
हिंदू महासभा अंतर्गत कार्यरत श्रीरामायण महासभाचे प्रधान महंत रामचंद्रदास ,सं.मंत्री गोपालसिंह, संघटक श्री.अभिरामदास यांची सार्वजानिक सभा हनुमान गढ़ी वर संपन्न झाली.त्यात ठरले त्या प्रमाणे , प.पू.श्री.वेदांती राम पदार्थदास जी यांच्या अध्यक्षतेत कार्तिक कृ.नवमी स रामचरित मानस चे १०८ नव्हान्न पाठ;समापन उ.प्र.हिं.म.स. अध्यक्ष महंत श्री दिग्विजयनाथ जी यांच्या उपस्थितीत स्वामी करपात्रीजी महाराज,कांग्रेसी बाबा राघवदास,बड़ा स्थान महंत श्री.बिन्दुगाद्याचार्यजी,रघुवीर प्रसादाचार्यजी यांचे भाषण प्रवचन झाले.तिथेच मार्गशीर्ष शु.२ श्रीराम जानकी विवाह तिथि वर राम चरित मानस चे ११०८ नव्हान्न पाठ करण्याचा संकल्प घोषित झाला. रामानंदीय निर्मोही आखाडा महंत श्री बलदेवदास ,राम जन्मस्थान पुजारी तसेच हिन्दू महासभा नगर कार्याध्यक्ष श्री.हरिहरदास ,नगरसेवक श्री परमहंस रामचंद्रदास दिगंबर आखाडा,तपस्वियों की छावनी चे अधिरिसंत दास,बाबा वृन्दावन दास,हिन्दू महासभा फ़ैजाबाद (अयोध्या) जिला अध्यक्ष ठा.गोपालसिंह विशारद यांनी रात्रीत संपुर्ण मंदिर परिसर स्वच्छ व समतल केला. ११०८ पेक्षा अधिक पाठकर्ता राम जन्मस्थान पासुन हनुमान गढ़ीपर्यंत रांगेत बसले होते त्यांत मुसलमान पाठकर्ता ही होते.
जहूर अहमद ला हें आयोजन रास नाही आलं त्यान मंडल कलेक्टर श्री.कृष्ण कुमार करुणाकर नायर कडे 'बाबरी वर कब्जा' अशी तक्रार नोंदवली.चार लोक अटक करण्यात आले ते नंतर सुटले. जहूर अहमद नी जुम्म्याच्या नमाज साठी अनुमती मागितली.डिसेंबर १९४९ च्या पहिल्या सप्ताहातील शुक्रवारी ८५ नमाजी पोहोचले देखील ! शेकडो श्रीराम भक्त व संत यांची गर्दी पाहुन परत गेले.पूजा-अर्चनेतील विघ्न बंद होऊन परिसर अतृप्त आत्म्यांपासुन मुक्त झाला. परिसरावर पसरलेली काळी छाया दूर झाली.
२४ डिसेंबर १९४९ अखिल भारत हिन्दू महासभा अधिवेशन डॉ.ना.भा.खरे यांच्या अध्यक्षतेत व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उपस्थितीत कोलकात्यात होऊ घातले होते.सावरकर यांनी येण्याच्या घातलेल्या अटी नुसार,श्रीराम जन्मस्थानावर संतांचे सहोत्साह अखंड भजन-कीर्तन श्रीराम जन्मस्थान मंदिरात सुरु झाले होते.दिनांक २३ डिसेंबर १९४९ च्या पहाटे ४ वाजता गर्भगृहात विलक्षण घटना घडली.बाबरच्या नावाने लांछित वास्तुत एकाएकी प्रकाश पसरला नि शंख,घंटा,नगारे वाजु लागले.श्रीराम नामाचा स्वर इतका उंच उठला कि,"शिशिर ऋतुत श्रीराम विग्रह प्रकट झाला या घटनेचा प्रत्यक्षदर्शी हवालदार अबुल बरकत खा मूर्छित झाला.ही वार्ता विद्युत् वेगाने पसरली दिवस उजाडे पर्यंत आकाशवाणी वर देशाने ऐकले.ज्याला जे मिळेल ते साधन घेऊन श्रीराम जन्मस्थाना कडे निघाले होते.
सहा हिंदू महासभाई संत नि सातवा स्वयं श्रीराम, सर्वश्री अभिरामदास,वृन्दावनदास,रामसुभगदास,रामसकलदास,रामबिलासदास,सुदर्शन दास महाराजांवर मुर्त्या स्थापित करण्याचा निराधार आरोप लागला.अभियोगा नंतर सर्व आरोपमुक्त झाले.तो,भाग वेगळा परंतु,स्थानीय पोलिसांनी तात्काळ नगर दंडाधिकारी,डेप्युटी कमिश्नर,पुलिस कप्तान यांना सुचित करुन जन्मस्थाना कडे धाव घेतली..प्रचंड जनसमुदाय जमला होता.पोलिस निशब्द होते.डेप्युटी कमिश्नर नायर यांना मुर्त्या हटविण्याचा आदेश मिळाला,त्यांनी स्पष्ट सांगितले कि असे केल्याने दंगा भडकेल नि परिस्थिती हाताबाहेर जाईल. D.I.G. U.P. सरदारसिंह विमानाने फ़ैजाबाद (अयोध्या) मोटर ने श्रीराम जन्मस्थानी पोहोचले.सरकार कडे वस्तुस्थिती प्रकट केली.सरकारं स्वयं निर्णय घेण्यास असमर्थ होती.जिल्हाधिकारी नायरना योग्य तो निर्णय घेण्याचे सांगुन नेहरूच्या आदेशाने मंदिराचे द्वार बंद करुन गर्भगृहास कुलुप घालण्यात आले.आत बाबा अभिरामदास, गुदड़ बाबा सेवेत असल्याने राहुन गेले.त्यांनी आतच उपोषण आरंभले त्यामुळे अयोध्येत हरताळ सुरु झाला. नगरातील संतांनी ,'जो पर्यंत श्रीरामललांना भोग लागत नाही तोवर भोजन नाही !' असा निर्णय घेतला.परिस्थितीची गंभीरता पाहुन जिल्हाधिकारी नायर यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखुन जबाबदारी ने "विवादग्रस्त वास्तु" घोषित करीत धारा १४५ अंतर्गत २६ डिसेंबर १९४९ ला राम जन्मस्थान परिसर कुर्की करीत २०० गज परिसरात गैरहिंदु प्रवेश प्रतिबंध घातला व पूजा-भोग आदी व्यवस्थेसाठी चार पुजारी नियुक्त करीत दर्शनार्थींसाठी लोखंडी दरवाजा बाहेरून व्यवस्था लाऊन दिली. ५ जानेवारी १९५० ला प्रियदत्त रामजी यांना रिसिव्हर म्हणुन नियुक्त केले.रामानंदीय निर्मोही आखाड्याचे पुजारी ब्रह्मलीन.भाष्करदास यांना रिसीवर ने व्यवस्थापक नियुक्त केलं नि.यथास्थिति साठी पोलीस ठाणे उभे केले.
 फ़ैजाबाद (अयोध्या) जिल्हा हिन्दू महासभा अध्यक्ष ठा.श्री.गोपालसिंह विशारदजी यांनी दिवाणी न्यायालयात १६ जानेवारी १९५० ला आदेश ७ सं.१ जाप्ता दिवाणी अंतर्गत स्वत्व ज्ञापक तसेच सतत प्रतिबंधात्मक वाद्पत्र ३/१९५० प्रस्तुत केले.यांत उ.प्र.सरकार ,डेप्युटी कमिश्नर-नायर,मार्कंडेय सिंह ,एडी.सिटी मजिस्ट्रेट-फ़ैजाबाद,पो,कप्तान-कृपालसिंह- फ़ैजाबाद,बड़ा बाजार-अयोध्या मधील जहूर अहमद,हाजी फेकू-टेढ़ी बाजार, महमद फायत-रायगंज, महमद समी चूड़ीवाला-कटरा, महम्मद आच्छन्न मिया यांना प्रतिवादी बनविले. मुस्लिम प्रतिवाद्यांनी निवृत्त न्यायाधीश सर इक़बाल ला आमंत्रित केलं ३ दिवस चाललेल्या युक्तिवादाचा सारगर्भ हाच कि,"हिंदू महासभेची याचिका फेटाळली जावी !" हिन्दू महासभा अधिवक्ता चौधरी केदारनाथजी यांनी याचिका स्वीकार करण्याचे तर्क मांडले नि मा.न्यायालया ने प्रतिवाद्यांना तत्काल निषेधाज्ञा लागु करीत ," मेरे अंतिम निर्णय तक मूर्ति आदि व्यवस्था जैसी है वैसी ही सुरक्षित रहे और पूजा,उत्सव, दर्शन जैसे हो रहे है वैसे होते रहेंगे !" या निर्णया विरोधात अपिलात गेल्यावर २६ एप्रिल १९५५ उच्चं न्यायालय न्यायमुर्ती.रघुवर दयाल-ओ.एच.मुथम यांनी अभ्यर्थना नाकारली.
सुलतानपूर चे आमदार मुहम्मद नाझिम नी कुराण मधील दाखला देत मुसलमानांना समजावले कि,"...जिस काम को करके एक मुसलमान गाजी का लकब पा सकता है,उसी काम को करके एक हिन्दू गुंडा कैसे हो सकता है?.." पण मानले नाहीत.
टांडा निवासी नूर उल हसन अंसारी याने D.S.P.अर्जुनसिंह यांच्या समक्ष साक्ष पण दिली, "मस्जिद में मुर्तिया नहीं होती,उसके स्तम्भों में भी मुर्तिया है.मस्जिद में मीनार और वजू करने जलाशय होता है वह यहाँ नहीं, स्तंभों पर लगी मुर्तिया सिध्द करती है की,यह मस्जिद मंदिर तोड़कर बनायीं है !"
अन्य १७ राष्ट्रिय मुसलमानांनी न्यायालयात शपथपत्र देत म्हटलंय कि," हम दिनों इमान से हलफ करते है की,बाबरी मस्जिद वाकई में राम जन्मभूमि है.जिसे शाही हुकमत में शहं शाह बाबर बादशाह हिंद ने तोड़कर बाबरी मस्जिद बनवाई थी.इस पर से हिन्दुओ ने कभी अपना कब्ज़ा नहीं हटाया.बराबर लड़ते रहे और इबादत करते रहे.बाबर शाह बक्खत से लेकर आज तक इसके लिए ७७ बलवे हुए.सं १९३४ से इसमें हम लोगोका जाना इसलिए बंद हो गया की,बलवे में ३ मुसलमान क़त्ल क़र दिए गए और मुकदमे में सभी बरी हो गए.शरियत के मुतालिक भी हम उसमे नमाज  नहीं क़र सकते क्यों की इसमें बुत है.इसलिए हम सरकार से अर्ज करते है कि,  ...!"
लिहून देणारे
वली मुहमद पुत्र हस्नु मु.कटरा ; अब्दुल गनी पुत्र अल्लाबक्ष मु.बरगददिया ; अब्दुल शफुर पुत्र इदन मु.उर्दू बाजार ; अब्दुल रज्जाक पुत्र वजीर मु.राजसदन ; अब्दुल सत्तार समशेर खान मु.सय्यदबाड़ा ; शकूर पुत्र इदा मु.स्वर्गद्वार ; रमजान पुत्र जुम्मन मु.कटरा ; होसला पुत्र धिराऊ मु.मातगैंड ;महमद गनी पुत्र शरफुद्दीन मु.राजा का अस्तम्बल ; अब्दुल खलील पुत्र अब्दुरस्समद मु.टेडीबाजार ; मोहमद हुसेन पुत्र बसाऊ मु.मीरापुर डेराबीबी ; मोहमदजहां पुत्र हुसेन मु.कटरा ; लतीफ़ पुत्र अब्दुल अजीज मु.कटरा ; अजीमुल्ला पुत्र रज्जन मु.छोटी देवकाली ; मोहमद उमर पुत्र वजीर मु.नौगजी ; फिरोज पुत्र बरसाती मु.चौक फ़ैजाबाद ; नसीबदास पुत्र जहान मु.सुतहटी
या सर्व घटना क्रमात १९ मार्च १९४९ ला श्रीराम जन्मभूमी मंदिर व  ६७:७७ एकर परिसर ह्या संपत्ती चा ट्रस्ट श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याने १५ पंच सदस्य ह्यांच्या माध्यमातुन अधिकृत पणे स्थापन करीत फ़ैजाबाद (अयोध्या) येथे नोंदवला आहे !
राजकीय घटनाक्रम :
गांधी वधा नंतर सावरकर सुटले होते,सावरकरांना (हिन्दू महासभा) मिळालेली सफलता राजकीय जनाधार-समर्थक मिळु नये म्हणुन नेहरू ने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना मंत्री पद सोडण्याचा दबाव बनवला होता.तर पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा बाळगुन असलेले सरदार वल्लभभाई यांनी,हिंदू महासभेतील "हिंदू" शब्द काढुन सर्व समाजाला दार उघडे करावे असा मुखर्जींच्या माध्यमातुन मांडलेला सल्ला सावरकर यांनी न मानल्यावर गोळवलकर गुरुजी व वसंतराव ओक यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हिंदू महासभा फोडुन मुखर्जीच्या नेतृत्वात, "भारतीय जनसंघ" उभारला !
इथं पर्यंत हिंदू महासभा १९४९ अयोध्या श्रीराम जन्मभूमी लांछन रहित आंदोलन प्रकरण इतिश्री !

श्रीराम जन्मभूमि मंदिर- ६७:७७ एकर परिसर सरकार ने कुर्क केल्याने त्याचेवर आपल्या "स्वामित्वाचा दावा"
श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा महंत रघुनाथदास जी यांचे चेले धरमदास द्वारा १७ डिसेंबर १९५९ ला वाद प्रस्तुत केला गेला. "वाद्पत्र के प्यारा १४ मे यह रिलीफ मांगी गयी थी कि प्रतिवादी सं.१ से श्रीराम जन्मभूमि की व्यवस्था-चार्ज श्री पंच रामानंदीय निर्मोही अखाड़े के हक़ में डिक्री की जाए." अशी मागणी १५२८ पूर्वी पासून श्रीराम जन्मस्थानावर कब्जा असणाऱ्या आखाड्याने केला कारण बाबराने पाठवलेला हुकुमनामा आहे,ब्रिटिश-मुस्लिम शासकांचे अभिलेख-ताम्रपट आहेत.
१४ जुन १९४१ नजुल रेकॉर्ड मध्ये निर्मोही चे महंत व पुजारी यांचा स्पष्ट घोषित कब्जा आहे.
१९ मार्च १९४९ ला नोंदणीकृत ट्रस्ट श्री पंच रामानंद निर्मोही आखाडा नावाने असुन त्याची संपत्ती ६७:७७ एकर श्रीराम जन्मस्थान मंदिर परिसर आहे,१५ पंच त्याचे नियमित सदस्य आहेत.
श्रीराम जन्मभूमी मंदिर व परिसर वक्फ ची संपत्ती नसतांना सन १९६२ मध्ये सुन्नी वक्फ बोर्डाने पै हाशिम अंसारी च्या माध्यमातुन विवाद आरंभ केला, "हिंदू महासभेने १९४९ मध्ये ठेवलेल्या मुर्त्या काढुन नमाज ची अनुमती मागणारी याचिका प्रस्तुत केली." हिंदू महासभा अयोध्या पूर्व नगर अध्यक्ष तथा दिगंबर अखाडा महंत परमहंस रामचंद्रदास यांनी O.P.W.No.१ न्यायालयात दिलेली साक्ष पृ.५५-६५ वर तसेच अतिरिक्त O.P.W.No.२ बाबु देवकी नंदन अग्रवाल ( रामसखा) यांची साक्ष पृ.१४२ वर अंकित आहे, दोघांनी कुर्की पूर्व तथा पश्चात् १२ वर्ष श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड़ा व सरपंच महंत श्री.भाष्कर दास महाराज यांचा श्रीराम जन्मभूमि वर सर्वाधिकार मान्य केलाय.

दर्शनार्थीं साठी उघड्या राम जन्मस्थानास नेहरूंच्या आग्रहाने लोखंडी दरवाजास कुलुप घातले गेले व कुलुप घालण्यास नकार देणाऱ्या मुख्यमंत्री संपूर्णानंद यांना पदच्युत केले.अश्या समयी हिंदू महासभा राष्ट्रीय अध्यक्ष श्री.नित्य नारायण बैनर्जी आयोजित १९६३ विज्ञान भवन,देहलीतील "विश्व हिंदू धर्म संमेलन" ज्याची अध्यक्षता पूर्व राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी केली.प.पु.श्री.शंकराचार्य द्वारका,पूरी,बद्रीनाथ, गोरक्ष पीठाधीश्वर,पञ्च पीठाधीश्वर आदि अन्य महानुभाव उपस्थित होते. या संतांना सोबत घेऊन जनसंघाने वडाळ्यात वि.हिं.प.ची स्थापना केली.तिकडे न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाच्या अभ्यर्थनेचे अध्ययन करून फेटाळत सन १९६४ मध्ये "मंदिर जैसे थे" असा आदेश दिला परंतु ,कुलुप निघाले नाही कि,पूजा-अर्चना-भोग-उत्सव-दर्शन यांत खंड पडला नाही.
पक्षकारांच्या मागणी नुसार सन १९६७-७७ दरम्यान पुरातत्व संशोधक समुहाने प्रा.लाल यांच्या नेतृत्वात उत्खनन केलं.त्यांच्या समुहात चेन्नई चे मुहम्मद के.के.सामील होते.ते म्हणतात, " तिथे प्राप्त स्तंभ मी पाहिले आहेत. J.N.U. च्या इतिहास तज्ञांनी आमच्या संशोधनाची एकच बाजु समोर मांडत दुसरी बाजु दडपली.उत्खननात प्राप्त अवशेष भु तळात मंदिराच्या स्तंभांना आधार देण्यासाठी रचलेल्या २२ ते २४ फुट विटांची रांग दोन मुखी हनुमान,विष्णु,परशुराम यांच्या मुर्तींसह शिव पार्वती ची मुर्ती देखील सापडली.या वरून तिथे मंदिर होते व मुसलमानांनी राम मंदिर निर्माण करण्यासाठी ही वास्तु हिंदूंना सोपवुन द्यावी."
भाजप च्या राजकीय उत्थाना साठी विहिंप चालवलेले प्रयत्न म्हणुन २१ जुलै १९८४ हिंदू महासभा खासदार महंत श्री.अवेद्यनाथजी यांच्या अध्यक्षतेत हिंदू महासभा घातियांनी सर्व दलीय "श्रीराम जन्मभूमि मुक्ति यज्ञ समिति" स्थापित केली.कांग्रेस नेता दाऊदयाल खन्ना यांना महामंत्री,हिंदू महासभाई महंत परमहंस रामचंद्रदास व महंत नृत्यगोपाल दास यांना उपाध्यक्ष ;रास्वसंघ प्रचारक दिनेशचंद्र त्यागी-ओमकार भावे-महेश नारायण सिंह यांना सहमंत्री बनविले.
     राम जन्मस्थान मंदिरात लागलेले कुलुप काढण्याची मागणी करीत ७ ऑक्टोबर १९८४ शरयु किनारी एक सार्वजनिक सभा भाजप उद्धारकांनी घेतली. ३१ ऑक्टोबर १९८५ उडुपी कर्नाटकात विहिंप ने कुलुप उघडण्याची ८ मार्च १९८६ महाशिवरात्रि ही अंतिम तिथी दिली.परंतु त्यासाठी याचिका नव्हती टाकली.
मंडल आयोग विरोधा कडुन कमंडलु कडे सोयीनुसार वळत असलेलं राजकारण रोखण्यासाठी कांग्रेस अधिवक्ता उमेशचंद्र पांडेय यांनी दिनांक २५ जानेवारी १९८६ ला याचिका टाकली ती २८ जानेवारी ला नाकारली गेली.म्हणुन ३१जानेवारी स जिल्हा न्यायालयात हिंदू महासभा-निर्मोही आखाड्यास मिळालेल्या आदेशाचे संदर्भ जोडत कुलुप उघडण्याची नवीन याचिका टाकली आणि १ फेब्रुवारी १९८६ न्यायमूर्ति कुष्ण मोहन पांडे जीं नी श्रीराम जन्मस्थान मंदिरात लागलेले कुलुप काढण्याचे आदेश दिले.३ फेब्रुवारी स मो.हाशिम कुरैशी व अधिवक्ता जफरयाब जिलानी (ज्यांना १९८३ भाजप द्वारा अपप्रचारीत बाबरी विवादाची माहिती नव्ह्ती) ने उच्च न्यायालयात अपील (अभ्यर्थना) केले ते फेटाळले गेले. दि.१२ मे १९८६ उ.प्र.सुन्नी वक्फ बोर्डाने याचिका टाकली.
     
राजकीय लाभासाठी भाजप व पुरस्कृत संघटनांनी "सर्व दलीय यज्ञ समिती" चा लाभ घेत संतांच्या खांद्यावर पक्षीय "न्यास" स्थापन केला,वस्तुतः हा अपराध होता परंतु राजकीय दडपणात ते ही शक्य झालं.दिनांक ८ जुन १९८६ मंदिर मुक्ति आंदोलनास प्रकट पणे "बाबरी कलंक" लावण्यात आला.
श्रीराम जन्मभूमी विषयक समस्त सुट जुलै १९८९ तीन न्यायमूर्ति पीठ उच्च न्यायालय लखनऊ ला वर्ग करण्यात आले.खंड पीठाने वि.हिं.प.ला सर्व विवाद मागे घेण्यास सांगितले.१४ ऑगस्ट १९८९ मा,न्यायलया ने मंदिर यथास्थिति बहाल करीत पूजा-अर्चना-दर्शना ची व्यवस्था यथावत घोषित केली.२७ ऑक्टोबर १९८९ H.C.च्या आदेशाने, श्रीराम शिला अयोध्येत पोहोचल्या. १० नोव्हेंबर १९८९ केंद्रीय गृहमंत्री बूटासिंह व उ.प्र.मुख्यमंत्री एन.डी.तिवारी यांच्या हस्ते श्रीराम जन्मस्थान मंदिराच्या जिर्णोद्धारा साठी श्रीराम जन्मस्थाना वर शिलान्यास संपन्न झाला. राजकीय श्रेयाच्या चढाओढीत भाजप ने देखील शिलापूजन कार्यक्रम संपन्न केला.हे सर्व करीत असतांना श्रीराम जन्मभूमि अधिपती व पक्षकार श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा व अखिल भारत हिंदू महासभा यांना जाणीव पूर्वक वगळले गेले.दिनांक १९ ऑक्टोबर १९९० पंतप्रधान यांनी महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते अध्यादेश काढुन ४३ एकर अविवादित भूमि अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव मांडला. इथे भाजप अधिकृत नसल्याने स्वीकार करू शकली नाही नि २१ ऑक्टोबर १९९० ला अध्यादेश परत गेला.
उत्तर प्रदेशात सत्तेचे सोपान हिंदुत्व नि बाबरी कलंक ठरला !हिंदू महासभा पूर्व खासदार स्व.बिशनचंद सेठ यांनी भाजपच्या या कृती विरुद्ध टिकास्त्र फेकले परंतु, "२०० गज मंदिर परिसरात गैरहिंदू प्रतिबंधित का ?" हे काही कारसेवकांना कळु दिल गेलं नाही.अखेर हिंदू सभा वार्ता १९९१ दिपावली विशेषांक श्रीराम जन्मभूमी बाबरी नाही याचा खुलासा करून सदर वास्तु ज्याला ढांचा बनवला ते मंदिर असल्याचा पुरावा देऊन हिंदू महासभेने भाजप नि समर्थकांचा बाबरी अपप्रचार रोखण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला.पण भाजप ने अखेर अपप्रचार करून कल्याणसिंग यांना मुख्यमंत्री बनवले.                                     

भाजप ने सत्ता प्राप्त करताच दुसरी चुक केली.६७:७७ एकर राम जन्मभूमी मधील २:७७ भूमि विवादित ठरवुन दिनांक १० ऑक्टोबर १९९१ ला विकासाच्या नावावर कब्जा मिळवला.ट्रस्ट श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याने २५ ऑक्टोबर १९९१ उच्च न्यायालयात याचिका टाकून विरोध केला.न्यायालयाने अधिग्रहण अस्थायी असल्याचे सांगत योग्य ठरवले.

दि.२-३ जुलै १९९२ पुरातत्व विभागाने श्रीराम जन्मस्थाना वर मंदिर असल्याचे प्रमाण दिले ,"प्राप्त अवशेषों के आधारपर ११ वी सदी में एक आकर्षक मंदिर था,उसका विध्वंस कर १६ वी सदी में मस्जिद सदृश्य वास्तु खडी की गयी.प्राप्त पूजा पात्र १३-१५ वी शताब्दी के है !" असं म्हटलं गेलं आहे तरी ही भाजप सरकार त्याची बाबरी म्हणत रक्षा करीत होती ! दरवर्षी प्रमाणे हिंदू महासभा उ.प्र. अध्यक्ष महंत श्री.रामदास ब्रह्मचारी जी यांनी गोरखपुर मध्ये प्रेस वार्ता घेऊन श्रीराम जन्मस्थान मंदिर सफा व रंग सफेदी साठी दि.१८ ऑक्टोबर १९९२ ला शेकडो कार्यकर्त्यांसह अयोध्या प्रयाण केल.हिंदू छात्र सभा नेत्री मीनाकुमारीच्या नेतृत्वात अनेक युवक-युवती आले होते.कल्याणसिंग सरकार ने बाबरी ची रक्षा करीत त्यांना अटक करून प्रतिबंधित केले.तिकडे अशोक सिंघल देहलीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार ला चेतावणी देत होते.'जन्मभूमि की समस्या का हल निकालने के लिए २४ ऑक्टोबर पर्यंत चा अवधी दिला होता तो,समाप्त होत असुन अजुन पुढे वाढवुन देणार नाही !" हिंदू महासभा पूर्व राष्ट्रिय अध्यक्ष-खासदार स्वर्गीय श्री.बिशनचन्द सेठ जी नी १९९२ दिपावलीस वृंदावन मधून "राम जन्मभूमि का संक्षिप्त इतिहास " नावाचे छोटेखानी पुस्तक प्रकाशित करीत पृ.४ वर लिहिलंय कि,"श्रीराम जन्मभूमि ,जिसे मुसलमान आणि तथाकथित हिंदू नेते बाबरी म्हणण्याचे दुस्साहस करत आहेत यांना एक प्रश्न केला पाहिजे कि ,ज्या स्थानावर मशिदीचे कोणते ही प्रमाण चिन्ह नाहीत तिथे मशिदीची संज्ञा कशी दिली जाऊ शकते ? त्याच बरोबर मशिदीत प्रदक्षिणा मार्ग नसतो ! परंतु,राम जन्मभूमि मध्ये परिक्रमा मार्ग आज ही  पूर्ववत सुरक्षित आहे.मुसलमान धर्मानुसार ज्या मशिदीत निर्धारित काळा पर्यंत नमाज झाली नाही तर ती मशिदीच्या श्रेणीत गणली जात नाही तरी ही खुर्चीच्या मोहाने अनेक नेता हा विषय निरर्थक गुंतवत आहेत.जेव्हा शिया समुदाय अनेक नेता पुन्हा पुन्हा हि घोषणा करत आहेत कि, रामजन्म भूमि को अनेक कारणों से मस्जिद मानना इस्लाम के विपरीत है  और उसे सस्नमान हिन्दुओ को सौपकर हमें शांति से भाईचारे के साथ इस देश में रहना चाहिए !"

इतके सर्व होऊन ही न्यायालय संरक्षित मंदिरास बाबरी कलंक लाऊन विरोधी वातावरण बनवित हिंदू विरोधी-राष्ट्रद्रोही संघटित करण्याचे षड़यंत्र थांबले नाही.  ६ डिसेंबर १९९२ कारसेवा पूर्व ३० नोव्हेंबर ला स्व.वाजपेयीजी पंतप्रधान राव यांना २० मिनिट भेटले गृहमंत्री शंकरराव चव्हाण उपस्थित होते.४ डिसेंबर ला  स्व.अर्जुनसिंह लखनऊ (लक्ष्मणपुरी) ला आले मुख्यमंत्री  कल्याणसिंह यांना भेटून परत देहली रवाना झाले.केंद्रीय गृह सचिव यांना I.S.I. एजंट कारसेवकांत मिसळल्याची सुचना दिली..दि.५ अयोध्येहून परतत रात्री उशिरा पर्यंत अडवानी,वाजपेयी,जोशी,कल्याणसिंह यांत गुप्त मंत्रणा झाली आणि वाजपेयी देहली परतले. Star newsT.V. (ABP) च्या रेकॉर्डिंग अनुसार वाजपेयीजी नी  "मंदिर समतलीकरण" करण्याचे संकेत सार्वजनिक सभेतुन दिले होते.
बाबरी कलंक धुतला जाण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी कथित हिंदू नेता प्रेक्षा मंचावर आसनस्थ झाले होते.प्रोत्साहनार्थ भाषण सुरु होती.देशात अघोषित बंद पाळला जात होता नि दुरदर्शन वर उत्कंठतेने पाहात होते. मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी कारसेवकांवर गोळ्या न चालविण्याचा लिखित आदेश दिला होता.  (संदर्भ तत्कालीन पोलीस अधिकारी -भाजप चे दोन वेळा सुलतानपुर खासदार व लेखक प्रमोद पंडित जोशी यांचे मित्र स्व.देबेन्द्र बहादुर राय)
श्रीराम जन्मभूमि स्थित तीन गुंबद मंदिराचा घेरा तोडुन कारसेवक छिन्नी,हातोडा,कुदळ,फावड़ा,पहार आदी घेऊन पुढे सरकत गेले.काही मंदिराच्या अंतर्भागात कुणी मानवी शिडी बनवुन कळसावर पोहोचले.दुपारी २:१५ ला एक गुंबद ,४:३० ला दुसरा ,४:४५ ला तिसरा गुंबद पडला.देशात हिंदूघाती बुतशिकनांनी शौर्य म्हणुन या दुष्कृत्याचा गौरव केला.मिठाया वाटल्या गेल्या आणि सैन्याने तात्काळ गतीने उध्वस्त मंदिर पुनर्स्थापित केलं. देशभरात राष्ट्रद्रोह्यांना दंग्यासाठी उकसवले गेले.पंतप्रधानांनी आपात बैठक बोलावुन धारा ३५६ च्या अंतर्गत उ.प्र.सरकार भंग केलं.दुसरी कडे श्रीराम जन्मस्थान मंदिर-परिसर ट्रस्टी श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे महंत जगन्नाथ दास महाराज यांनी याची FIR नोंदवत ,'जीनकी धर्म पर आस्था नहीं उन्होंने मंदिर ध्वस्त किया !' अशी तक्रार नोंदवत न्यायालयात मूलवाद पत्र पेरा.४ A मध्ये अंतर्भूत आहे दोनशे करोड भरपाई चा दावा टाकला.सर्वोच्च न्यायालया ने १० डिसेंबर १९९२ ला दर्शन पूजन करण्याचा सन १९५० हिंदू महासभेस मिळालेल्या न्यायालयीन आदेशास स्थिर ठेऊन यथास्थिति बनवुन राखण्याचा निर्देश दिला. ७ जानेवारी १९९३ केंद्र सरकार ने संपुर्ण मंदिर परिसर अध्यादेश द्वारा अधिग्रहित केला.त्यावर ही ट्रस्टी श्री पंच रामानंद निर्मोही आखाडा यांनी आपत्ती घेतली.
अखिल भारत हिंदू महासभा २४ जुन २००० खुरशेद बाग़,हिंदू महासभा कार्यालय लखनऊ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेने उ.प्र.राज्यपाल महोदयजी यांना ज्ञापन देऊन श्रीराम जन्मस्थान विवाद सुनावणी साठी "फास्ट ट्रेक कोर्ट" द्वारा सुनावणी ची मागणी केली. १० डिसेंबर २००० च्या देहली केंद्रीय कार्यालय मधील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत संसदेत विधेयक मांडुन श्रीराम जन्मभूमी हिंदूंना सोपविण्याचा प्रस्ताव आला. तर ६-७  जुल २००२ देहली केंद्रीय कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत (लेखक) प्रमोद पंडित जोशी नी , "सैकड़ो वर्षो की परंपरा से निर्मोही अखाड़े के स्वामित्व में रही श्रीराम जन्मभूमि अविलम्ब निर्मोही अखाड़े को मंदिर पुनर्निर्माण के लिए सौपी जाए !" असा प्रस्ताव महामंत्री श्री.सतीश मदानजी यांच्य अनुमोदनाने मांडला व कार्यसमिति ने पारित केला.या संदर्भात लिखित पत्र माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिनेशचंद्र त्यागी यांनी एप्रिल २००४ मध्ये श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा चित्रकुट येथील ब्रह्मलीन महंत रामाश्रय दास महाराज व विद्यमान श्री पंच रामानंदीय अखिल भारत निर्मोही आखाडा सरपंच श्री राजा रामचंद्राचार्य यांना देण्यात आले आहे.

२३ फेब्रुवारी २००४ लखनऊ त श्रीराम जन्मभूमी विवादाची फास्ट ट्रैक कोर्ट ची सुनावणी आरंभ झाली.हिंदू महासभेचे अधिवक्ते जसे टी व्ही वर प्रतिक्रिया देऊ लागले स्व.वाजपेयी जीं नी सहा महिने अगोदर सरकार भंग करीत निवडणुका लादल्या.रामनामावर धन आणि सत्ता मिळवुन देशाला भ्रमित करणाऱ्यांना आराध्य श्रीराम यांनी ही क्षमा केली नाही.के.के.के.नायर आणि डी.बी.रायजी यांचा राजकीय लाभासाठी वापर करून त्यांना फेकुन देणाऱ्या गद्दारांना श्रीरामाने सत्ताच्युत केले. जर श्रीराम मंदिर विषयक ईमानदार असते तर ट्रस्टी श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्यास जन्मभूमी परिसर सोपवुन देण्याचा व मंदिर पुनर्निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करणारा अध्यादेश काढणे सहज शक्य होते. ते केले नाही !
त्यात अडवाणी जी कराचीत गेले नि जीनां ला सेक्युलर म्हणत त्याच्या थडग्यावर फुले वाहिली काय नि बाबरी विध्वंस केल्याची क्षमा मागितली काय २००५ अयोध्येत आत्मघाती हल्ला झाला.या हल्ल्यातील आरोपी अब्दुल बंकी मंडल ला राष्ट्रद्रोहात अटक झाली आहे.पण १९९२ हल्ल्यातील आरोपींना बाबरी विध्वंस आरोप लावले गेले आहेत.         

अखिल भारत हिंदू महासभा राष्ट्रीय कार्यकारिणी ५-६ जून २००४ उपाध्यक्ष स्व.श्री.बैद्य बटुक प्रसाद त्रिपाठी (हिन्दुराष्ट्र सेना १९५७-पूर्व सेनापति) यांनी ,"श्रीराम जन्मभूमि पर मंदिर निर्माण के लिए श्री पंच रामानंदीय निर्मोही अखाडा और हिन्दू महासभा द्वारा १९५० से जो वाद न्यायालय में चल रहा है के अनुसार,अन्य किसी भी संस्था /ट्रस्ट को इस अभियान में हस्तक्षेप करने से रोका जाये.बारबार नित्य नए फर्जी ट्रस्ट बनाकर श्रीराम जन्मभूमि हड़पने का षड़यंत्र भिन्न संस्थाओ,नेता,आचार्यो द्वारा किए जा रहे है उनपर केंद्र सरकार,मा.न्यायालय रोक लगाये." अश्या प्रकार चा प्रस्ताव मांडला व राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.श्री.दिनेशचन्द्र त्यागी जी यांनी कार्यकारिणीच्या अनुमोदनाने समर्थन केले.                               

दि.१७ जुन २००५ महामहिम राष्ट्रपती जी ना हिंदू महासभेने हजारो श्रीराम भक्तांच्या स्वाक्षरीने श्रीराम जन्मस्थान मंदिर ध्वंसींना राष्ट्रद्रोहात अटक करण्याची मागणी केली आहे जी प्रलंबित आहे.
जमात ए उलेमा ए हिंद देवबंद अधिवेनातं केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम ने ६ डिसेंबर ९२ च्या घटनेस "धार्मिक उन्माद" असे संबोधले तर उलेमांनी मागणी करताच लिबरहान आयोगाची रिपोर्ट माननीय पंतप्रधान यांना सोपवली गेली.वास्तविक पाहता न्यायालय संरक्षित श्रीराम जन्मस्थान मंदिर विध्वंस चौकशी व्हायला हवी होती ती,बाबरी विध्वंस म्हणुन झाली याचा साधा निषेध मंदिराला कलंक लाऊन पाडणाऱ्यांनी केला नाही.याचे शौर्य नि श्रेय यात गौरव मानत राहिले.हिंदू महासभेने लाल किल्ला छावणी समोर विरोध प्रदर्शने केली ३९ हिंदू महासभाई अटकेत गेले.दुसरी कडे १९४९ हिंदू महासभा अयोध्या आंदोलनाची उच्च न्यायालयाने मागितलेली फाईल गहाळ झाल्याची बातमी प्रकट पणे टी व्ही वर झळकली.हिंदू महासभेच्या वतीने प्रमोद पंडित जोशी ने  १४ जुन २००९ ला केलेल्या मागणी नुसार प्रतिवादी उत्तर प्रदेश सरकार ने १० जुलै ला ए.के.सिंह द्वारा हजरत गंज लखनऊ पोलीस ठाण्यात  F.I.R लिहिली गेली.

अखिल हिन्दू सभा वार्ता (पाक्षिक) दि.१५-३१ जुलै २००९ निम्न वृतांत साभार
उ.प्र.मुख्यमंत्री ने,"अयोध्या प्रकरणातील पत्रावलि गहाळ झाल्याची तक्रार करीत C.B.I.द्वारा चौकशी करण्याची संस्तुती करीत आशंका व्यक्त केली आहे कि,या पत्रावली १९९१-२००० च्या मध्य भाजप शासन काळात गहाळ झाली असावी.जे गंभीर आहे.. H.C. ने U.P. सरकार कडे १९४९ अयोध्या हिंदू महासभा आंदोलन प्रकरणातील ७ अभिलेख मागितले होते. गृह विभागाचा अनुमान आहे कि,या अभिलेखांशी संबंधित २३ पत्रावली तत्कालीन O.S.D.सुभाष भान साध कडे होती.साध चा वर्ष २००० मध्ये लिबरहान आयोगात साक्ष द्यायला जातांना ट्रेन दुर्घटनेत मृत्यु झाला होता !." (इति मायावती)

 श्रीराम जन्मभूमि विवाद सुनावणी करीत असलेल्या खंडपीठ न्यायालयाच्या लखनऊ विशेष पीठ न्यायमूर्ति श्री.डी.वी.शर्माजी यांनी १९४९ अयोध्या आंदोलनात केंद्र सरकार ने पाठवलेले आदेश व कार्यवाही ७ अभिलेख प्रस्तुत करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारचे अपर महाधिवक्ता यांना देत पुढील सुनावणी १४ जुलै २००९ ला ठरवली होती. अभिलेख न मिळाल्याने शोधासाठी मुख्य सचिवा ने सामान्य प्रशासन- प्रमुख सचिव यांच्या अध्यक्षतेत समिती बनवली आणि समिती ने सुनावणी पुर्वीच ४ जुलै ला पीठा समोर शपथपत्रा सह,जे गृह सचिव जाविद अहमद यांनी सांगितलेल्या मजकुरानुसार केलं गेलं होत.  त्यात म्हटलंय कि,,"रेकोर्ड में २३ पत्रावलियां उपलब्ध नहीं है,वर्ष १९९२ में साम्प्रदायिकता नियंत्रण प्रकोष्ठ की स्थापना से पूर्व तत्कालीन विशेष अधिकारी साध जो अनुभाग से समीक्षाधिकारी थे.वे मंदिर-मस्जिद सम्बंधित कार्य देखते थे.प्रकोष्ठ में विशेष कार्याधिकारी पद के सृजन के बाद सुभाष भान साध ने प्रकोष्ठ का कार्यभार ग्रहण किया था और अपने साथ सम्बंधित पत्रावली रजिस्टर भी ले गए थे.प्रकोष्ठ की पत्रावलियों व्र रजिस्टर आदि के अवलोकन से यह स्पष्ट होता है कि, यह पत्रावलियां प्रकोष्ठ में उपलब्ध है जिसकी सूचि नियंत्रण प्रकोष्ठ द्वारा बनायीं गयी है.परन्तु,गृह- पुलिस अनुभाग १२ में रेकोर्ड कि जाँच कोई भी पत्रावली प्रकोष्ठ को स्थानांतरित हुई प्रतीत नहीं होता.गृह सचिव महेश गुप्ता इस बात का उत्तर नहीं दे सके कि सम्बंधित पत्रावलियां किस विभाग से गायब हुई और इसके लिए कौन उत्तरदायी है.यह विवेचना का विषय है."
२६ जुलै २००९  मा.न्यायालयाने १९४९ हिंदू महासभा आंदोलन संबंधि फाइल्स न मिळण्याच्या स्थितीत पक्षकार निर्मोही अखाडा-हिन्दू महासभा व अन्य यांचा पक्ष ऐकून निर्णय लंबित ठेवला,जो लिबरहान आयोगाच्या रिपोर्ट प्रस्तुतीत दडपला गेला.याच काळात राजकीय षड्यंत्रानुसार.श्रीराम जन्मभूमि विवाद न्यायालयीन निर्णय घोषित करण्याचे वातावरण निर्माण केले गेले देशभरात उत्साह-भय असे विरोधी वातावरण ही निर्माण केले गेले.संवेदनशील परिस्थिती चे नियंत्रण करण्याकरिता केंद्र व राज्य सरकारला तयारी करावी लागली .अंतत ३० सप्टेंबर २०१० ला शर्मा,अग्रवाल,खान या तीन सदस्य न्यायमूर्ती पीठाने  २.७७ एकर विवादित भूमि चा १/३ वाटणी चा निर्णय घोषित करीत निर्मोही-वक्फ-रामलला हिंदू महासभा यात विभागणी करीत वाटप करीत असल्याचे घोषित केले. हा निर्णय घोषित होताच हिंदू महासभेचे अधिवक्ता म्हणून भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी याचे स्वागत करीत असल्याचे सांगत देशाला भ्रमित केले. टी व्ही वर तशी पट्टी ही खाली येत होती.भाजप-जमात ए उलेमा चे प्रतिनिधि या निर्णयाचे स्वागत करीत होते अखेर हिंदू महासभा नेते प्रमोद पंडित जोशी यांनी समाचार चलित माध्यमांना फोन करीत श्री रविशंकर प्रसाद हिंदू महासभेचे अधिवक्ते नाहीत हे सांगितल्यावर रात्री पट्टीका काढली.  मंदिर-मस्जिद समझोत्याच्या प्रयत्नात भाजप-विहिंप पूर्वी पासून सक्रिय होती. (उदाहरण-श्रीकृष्ण जन्मभूमी ) भाजप ला इंदौर अधिवेशनात जमात ए उलेमा ए हिंद ने समर्थनपत्र का दिले होते ?
आश्चर्य हे आहे कि,१९६२ सुन्नी वक्फ बोर्डाने हिंदू महासभेवर मुर्त्या ठेवल्याचा आरोप लावला होता ते स्थान १९८९ न्यायालयाने विहिंप ला बेदखल केल्यावर ,"रामसखा" बनून आलेले.देवकी नंदन अग्रवाल कसे दावेदार ठरतात ?
१९८९ न्यायलायने बेदखल केलेला मुस्लिम पक्ष कसा दावेदार ठरतो ?
स्व.देवकी नंदन अग्रवालजी १९६२ केस मध्येसुन्नी वक्फ बोर्डाच्या विरोधात निर्मोही आखाड्याच्या बाजूने साक्ष देत आहेत ते काय राम जन्मभूमी हडपण्यासाठी खरीदले गेले नव्हते ?
१९४९ फैजाबाद (अयोध्या) जिल्हा महामंत्री गोपालसिंग विशारद यांचे सुपुत्र.श्री.राजेंद्रसिंह यांना ही भाजप ने नय्यर-डी.बी.राय प्रमाणे गंडवले नि सोबत घेतले होते.हिंदू महासभा १९४९ सफल आंदोलनात जनाधार वाढू नये म्हणून काँग्रेसच्या इशाऱ्यावर हिंदू महासभा तोडुन जनसंघ बनविणाऱ्या भाजप ने श्रीराम जन्मभूमी बळकाविणे-वाटण्या करणे यासाठी जे राजकीय षडयंत्र केले ते कधीच समोर येत नसल्याने खरे काय ? ते दडपले गेले !
मात्र न्यायालयाच्या १ /३  निर्णया विरुध्द भाजप वा समर्थक कधी सर्वोच्च न्यायालयात गेले का ?
दि.२१-१२-२०१० हिंदू महासभेने देवकी नंदन अग्रवाल आणि अन्य विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रस्तुत केली. मा.सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ या दिवशी भाजपाने विवादित बनविलेल्या २;७७ एकर जमिनीची १ / ३ वाटणी दि.३० सप्टेंबर २०१० चा निर्णय रोखत दर्शन-पूजन पूर्ववत आज्ञा देत हिंदू महासभेस मिळालेल्या निस्वार्थ यशस्वी लढ्याचे द्योतक ! दि.९ मे २०११ सुप्रीम कोर्ट निर्णय पश्चात् श्रीराम जन्मभूमि स्वामित्व विवाद शेष होता म्हणून प्रमोद पंडित जोशी ने मा.मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांना दि.१० जुन २०११ ला १९४९ गहाळ फाईल सी.बी.आय. चौकशी साठी निवेदन केल. श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्याचे तत्कालीन सरपंच कार्यवाहक सर्वराह्कार.भाष्कर दास महाराज यांची २० जुन २०११ ला श्री हनुमान गढ़ी,नाका,अयोध्या (फ़ैजाबाद) येथे दर्शन घेऊन आशीर्वाद आणि समर्थन मागितले.ते त्यांनी स्वाक्षरी करून दिले !
३० जुलै २०१० महामहिम राष्ट्रपती महोदया यांना "मंदिर विध्वंस चौकशी व मंदिर विध्वंसकांना राष्ट्रद्रोहात अटक " ही मागणी करीत हिंदू महासभेने २०१० मध्ये उच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसर स्वामित्वाची थांबलेली सुनावणी आरंभ करण्याची विनंती केली.तसेच हिंदू पक्षकारांस सुरक्षा पुरविण्याची मागणी केली.
२३ डिसेंबर २०१५ श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसर लांच्छन मुक्ती ६६ वर्ष वर्धापन दिनी माननीय चीफ जस्टीस ऑफ इंडिया यांना अयोध्येत जिल्हाधिकारी कार्यालय माध्यमातुन निवेदन करीत श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसर ६७;७७ एकर श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्यास सोपविण्याची मागणी करीत २६ जुलै २०१० ला स्वामित्वाची थांबलेली सुनावणी सुरु करण्याची विनंती करीत श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा १९४९ नोंदणीकृत ट्रस्ट असतांना राजकीय स्वार्थासाठी आर्थिक लाभासाठी उभारलेले समानांतर ट्रस्ट-न्यास विविध संस्था यांची चल-अचल संपत्ती जप्त करून त्यातून श्रीराम जन्मस्थानावर मंदिर पुनर्निर्माण करून श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाड्यास सोपवावे ! अशी मागणी करण्यात आली.
डिसेंबर २०१६ प्रमोद पंडित जोशी यांनी चीफ जस्टीस ऑफ इंडिया यांना पाठविलेल्या याचिकेत पक्षकारांत मध्यस्थता करीत श्रीराम जन्मभूमी विवाद सामंजस्याने सोडविण्याची विनंती केली होती ती माननीय न्यायालयाने मान्य करीत घोषणा केली.त्यानुसार,९ जून २०१७ टेडी बाजार-अयोध्या येथे पक्षकारांत सामंजस्य बैठक झाली.त्यानुसार,मुस्लिम पक्षास वैकल्पिक भूमी श्री पंच रामानंदीय निर्मोही आखाडा देण्याचा पंच बैठकीत प्रस्ताव करील असे आश्वासन देण्यात आलं.त्यावर श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसराची बाऊंड्रीवाल बांधण्यास अनुकुलता प्राप्त झाली. त्यानुसार दिनांक ४ ऑगस्ट २०१७ ला चीफ जस्टीस ऑफ इंडिया व पंतप्रधान कार्यालय यांना पक्षकारांना भेटीसाठी वेळ मागितला गेला.त्यावर सरकार गंभीर नाही म्हणुन पक्षकार-सरकार यांत मध्यस्थता घडविण्यासाठी श्री श्री रविशंकर जी यांचा प्रस्ताव स्वीकार करीत कनकपूर-बेंगलोरू आश्रमात बैठक झाली.त्यानंतर अयोध्या-लखनऊ येथे हिंदू-मुस्लिम धर्माचार्य-नेते यांच्या भेटी झाल्या नि चीफ जस्टीस ऑफ इंडिया ने सुनावणी ची तिथी घोषित केली.माननीय न्यायालयाने सर्व प्रथम हिंदू महासभेच्या मागणी नुसार टायटल सुट - जमीन विवाद म्हणत तर्क ऐकण्यात वेळ दिला.श्री. दीपक मिश्रा यांनी नमाज-मशीद यांची अनिवार्यता समाप्त करीत विवाद संपवत आपला कार्यकाळ पूर्ण करीत सेवा निवृत्त झाले.
माननीय सर्वोच्च न्यायालयात कुराण शरीफ शेरवानी संस्करण-'किताब घर -लखनऊ ही प्रत देऊन पृष्ठ क्रमांक ३४५ नुसार विवादित जागेवर मशीद नापाक म्हटल्याचा आधार देण्यात आला आहे !
कोणत्याही विवादासाठी ;-
अखिल भारत हिंदू महासभा,हिंदू महासभा भवन,मंदिर मार्ग,नवी देहली-११०००१
akhilbharat_hindumahasabha@yahoo.com

लेखक-संपादक प्रमोद पंडित जोशी
प्रकाशक - अखिल हिंदू राष्ट्रसभा प्रकाशन
सापाड , कल्याण (प.) ४२१३०१
पुस्तक छापणे नि वितरण यांचा मेळ बसविणे शक्ती अभावी अशक्य असल्याने सदर पुस्तक न छापता हा उद्योग आपल्या हातातील भ्रमणभाष मध्ये !
कुणाला पुस्तक किंमत स्वरूपात ऐच्छिक रक्कम द्यायची इच्छा असल्यास मनी ऑर्डर करू शकतात !

30 नवंबर 2018

कांधे मुंज जनेऊ साजे !

पराशर संहिता में लिखा गया है कि,स्वयं सूर्यदेव ने हनुमानजी के विवाह पर यह कहा कि,"यह विवाह ब्रह्मांड के कल्याण के लिए ही हुआ है और इससे हनुमान का ब्रह्मचर्य भी प्रभावित नहीं हुआ।"
हनुमानजी ने भगवान सूर्य को अपना गुरु बनाया था।हनुमान,सूर्य से अपनी शिक्षा ग्रहण कर रहे थे... सूर्य कहीं रुक नहीं सकते थे इसलिए हनुमानजी को सारा दिन भगवान सूर्य के रथ के साथ साथ उड़ना पड़ता और भगवान सूर्य उन्हें तरह-तरह की विद्याओं का ज्ञान देते थे ।

परंतु, हनुमानजी को ज्ञान देते समय सूर्य के सामने एक दिन धर्मसंकट खड़ा हो गया।

कुल ९ प्रकार की विद्याओं में से हनुमानजी को उनके गुरु ने पांच तरह की विद्या तो सिखा दी परंतु बची चार प्रकार की विद्या और ज्ञान ऐसे थे जो केवल किसी विवाहित को ही सिखाए जा सकते थे।हनुमानजी पूरी शिक्षा लेने का प्रण कर चुके थे और इससे कम पर वो मानने को तैयार नहीं थे।

यहां भगवान सूर्य के सामने संकट था कि वो धर्म के अनुशासन के कारण किसी अविवाहित को कुछ विशेष विद्याएं नहीं सिखा सकते थे।

ऐसी स्थिति में सूर्य देव ने हनुमान को विवाह की सलाह दी.. और अपने प्रण को पूरा करने के लिए हनुमान भी विवाह सूत्र में बंधकर शिक्षा ग्रहण करने को तैयार हो गए।

परंतु, हनुमानजी के लिए वधु कौन हो और कहा से वह मिलेगी इसे लेकर सभी चिंतित थे।ऐसे में सूर्यदेव ने अपने शिष्य हनुमान को राह दिखलाई।

भगवान सूर्य ने अपनी परम तपस्वी और तेजस्वी पुत्री सुवर्चला को हनुमान के साथ विवाह के लिए तैयार कर लिया।

इसके बाद हनुमानजी ने अपनी शिक्षा पूर्ण की और सुवर्चला सदा के लिए अपनी तपस्या में लिन हो गई।

इस प्रकार हनुमानजी भले ही विवाह के बंधन में बंध गए हो परंतु शारिरीक रूप से वे आज भी एक ब्रह्मचारी ही हैं।

पराशर संहिता में तो लिखा गया है की स्वयं सूर्यदेव ने इस विवाह पर यह कहा कि,यह विवाह ब्रह्मांड के कल्याण के लिए ही हुआ है और इससे हनुमान का ब्रह्मचर्य भी प्रभावित नहीं हुआ ..

वाल्मीकि रामायण के युध्द काण्ड में राक्षस,वानर आदि मनुष्य थे।सुग्रीव पक्ष के लोगो को मनुष्य के रूप में युध्द न करने का आदेश देकर केवल सात व्यक्ति ही पुरुष के रूप में लड़ेंगे। शेष वानर रूप धर कर लड़ेंगे ऐसा लिखा है।

* युध्द काण्ड सर्ग ३७ श्लोक ३३,३४,३५ -

न चैव मानुषं रूपं कार्य हरिभिरहवे ;

एषा भवतु नः संज्ञा युध्देsस्मिन् वानरे बले .

वानर एव नश्चिह्रं स्वजनेsस्मिन् भविष्यति ;

वयं तु मानुषेणैव सप्त योत्स्यामहे परान् .

अहमेव सः भ्रात्रा लक्ष्मणेन सहौजसा ;

आत्मना पञ्चमश्चयं सखा मम विभीषण: .
हनुमान जी को व्याकरण का ज्ञाता कहा है.युध्द वेद संगत कहनेवाले वेदज्ञ विद्वान कहा है। रामायण की निम्न पंक्तिया हनुमान जी की शास्त्रीय योग्यता दिखाने पर्याप्त है। 
ना ऋग्वेदविनीतस्य ना यजुर्वेदधारिणः ;

ना सामवेदविदुषः शक्यमेवं प्रभाषितुम् .

नूनं व्याकरणं कृत्स्नमनने बहुधा श्रुतम् ;

बहुव्याहरतानेन न किञ्चिदपशब्दितम् .।.

अब हनुमानजी को अविवाहित ,पिछड़ी जाती या वनवासी कह सकता है वह मुर्ख है !

8 अक्तूबर 2018

मंदिरों को तोड़ दो व ब्राह्मणो को सीमापार कर दो !

 विश्व में शांतीदूत बनकर सत्ता विस्तार करनेवाले पाश्च्यात्य समाज कहे या धर्म प्रचारको ने भारत-गोवा में पोर्तुगीज सत्ता स्थापित करने के पश्चात् किये अत्याचारो के यह पढ़िए प्रमाण :-

    "सरन्यायाधीश नोरोन्य ने लिखे ग्रंथ में लिखा है ,'८ मार्च १५४६ पोर्तुगाली राजा की ओर से आया फर्मान देखिये,'हिंदूं मंदिरों को तोड़ दो व ब्राह्मणो को सीमापार कर दो।' १५५७ गोवा के पादरियों ने गव्हर्नर को जो पत्र लिखा है उसमे वह कहते है,'भारत अपनी साम्राज्य सत्ता में रहे इसलिए ख्रिस्ती धर्म का प्रसार करो।



 मृत हिंदु की स्त्री तथा बच्चो ने ख्रिस्ती धर्म का स्वीकार नही किया तो,उनकी सम्पदा जप्त करो।.' पोर्तुगाल के राजाने जिस आर्चबिशप को भारत भेजा,वह लिखता है कि,गोवा के पाद्री क्रूर,निंद्य व विषयलोलुप है।अपनी इच्छा तृप्त न करनेवाली स्त्री को धर्म विरोधक कहकर जलाया जाता था।"

संदर्भ-दैनिक केसरी-पुणे दिनांक १६ जून १९५३ पं.सातवळेकर गुरूजी जो हिन्दू महासभाई थे।

सरदार पटेल का प्रधान बनना निश्चित था।

जवाहरलाल नेहरू के नाम का प्रस्ताव किसी भी कोंग्रेस प्रदेश कमेटी ने नहीं भेजा था।सरदार पटेल का प्रधान बनना निश्चित था।
29 October 2013 at 13:07


      ७ अक्टूबर से ११ सन १९४५ CWC कोलकाता में हुई जिसमे अप्रेल १९४६ में राष्ट्रिय अधिवेशन के साथ राष्ट्रिय (अध्यक्ष) प्रधान पद के लिए २९ अप्रेल तक नाम मांगे गए थे।विभिन्न प्रांतीय कमिटियों से जो तिन नाम आये थे,सरदार पटेल-जे.बी.कृपलानी-पट्टाभि सीतारामैय्या।जवाहरलाल का नाम प्रस्तावित भी नहीं था।

       गांधीजी मार्च १९२० से ब्रिटिश हस्तक नेहरु परिवार के कालापानी या हत्या,भय के कारण गुलाम बने थे।एनी बेझेंट और लोकमान्य तिलक जी को बांदिवस या अभियोग में लटकाने में मोतीलाल नेहरू के जवाहरलाल को भेजे पत्र से स्पष्ट होता है।सम्भवतः ब्रिटिश सरकार नेहरु के साथ साथ कोंग्रेस सत्ता की पक्षधर थी।इसलिए गांधीजी ने जवाहरलाल का नाम प्रस्तावित न होने पर भय के साथ,'उसे प्रधान होना चाहिए !' कहा था।

        कृपलानी "Gandhi-His Life & Thought-Page 248" लिखते है,'नामांकन की अंतिम तिथि समीप थी और प्रदेशो के प्रस्ताव आ चुके थे।अब अखिल भारतीय कोंग्रेस कमेटी के १५ सदस्यो के हस्ताक्षरों से नाम प्रस्तावित किया जा सकता था।CWC की बैठक दिल्ली में हो रही थी।मैंने एक कागज पर लिखकर जवाहरलाल के नाम का प्रस्ताव घुमा दिया।कार्यकारिणी के सदस्यो ने हस्ताक्षर कर दिए।इस प्रकार जवाहर का नाम प्रस्तावित नामो में आ गया।इसपर अन्य सदस्यो ने अपने नाम वापस ले लिए।"यह निश्चित था यदि जवाहर का नाम प्रस्तावित न किया जाता तो,सरदार पटेल प्रधान बन जाते !"सरदार ने मेरी इस हरकत को पसंद नहीं किया। मै समझता नहीं था,स्वतंत्रता जैसी-कैसी भी आनेवाली है,समीप आ गयी है।'

       यह पूर्ण सत्य नहीं था।एन.बी. उपाख्य काकासाहेब गाडगीळ "Govt. from Inside-Page 11" लिखते है,"हममे से कुछ ने यह विचार किया था कि, वल्लभभाई का नाम कोंग्रेस के प्रधान पद के लिए प्रस्ताव करेंगे।परंतु,कुछ गांधीवादीयो ने कह दिया कि, गांधीजी चाहते है जवाहरलाल प्रधान बने,क्योंकि यदि वह प्रधान नहीं होगा तो वह प्रधानमंत्री नहीं बनेगा।तब वह क्या करेगा ? पता नहीं ! अतएव गांधीजी ने अपने अनुशासन में रहनेवाले शिष्य सरदार पटेल को कहा और उन्होंने अपना नाम वापस ले लिया।"

      इस प्रकार सरदार पटेल प्रधानमंत्री पद के दावे से भी चूकते देख गांधी जी ने पटना में कोंग्रेस विसर्जन की मांग की ? गुरु गोलवलकर जी को अखंड भारत का वचन देकर नेहरू रास्वसंघ का समर्थन लेकर विभाजन के लिए प्रधानमंत्री बने ? क्या इसलिए सरदार पटेल ने द्वितीय कोंग्रेस को जन्म देने के लिए गोलवलकर गुरूजी से तिहार जेल में भेट कर वैकल्पिक राजनीती का मार्ग स्थापित किया था ? भारतीय जनसंघ इन्ही विचारों की देन नहीं है।जिसे हिन्दू महासभा "हिन्दू" शब्द त्यागती नहीं देखकर नेहरू-पटेल के इशारेपर बनाया गया ?
अखंड भारत और हिंदुराष्ट्र दोनों के साथ विश्वासघात हुआ ! विभाजनोत्तर भारत में हिंदू राजसत्ता की वीर सावरकरजी की १० अगस्त १९४७ की मांग को ठुकरानेवाले नेहरू-गाँधी के पिछलग्गु न बनते तो ?


2 अगस्त 2016

बौध्द मतावलंबी हिन्दू श्रीराम जन्मस्थान पर किस आधारपर अपना दावा कर रहे है ?

महाभारत में कहा गया है,"प्लावन से पूर्व इस वेद में कहे धर्म का नाम "सात्वत धर्म" था।" इसी धर्म का प्रचार मनु के वंश श्राध्ददेव के पुत्र इक्ष्वाकु ने किया। रामायण में श्रीराम को इक्ष्वाकु वंशी निरुपित किया गया है। श्रीराम का जन्म  उत्तर कौशल प्रमुख शाखा की ३९वी पीढ़ी में महाराज दशरथ के पुत्र के रूप में हुवा। चैत्र मासके शुक्ल पक्ष की नवमी को कर्क लग्न पुनर्वसु नक्षत्र,मध्यान्ह में सूर्य के मेष राशी में स्थित होने पर हुवा।कालिदास ने रघुवंश के १६ वे सर्ग में, जानकी हरण के कवी कुमार दास ने अयोध्या का सुन्दर वर्णन किया है।                                                                                                                                 
*जैन ग्रंथो में अयोध्या का वर्णन "तिलक मंजिरी"में धनपाल ने बढ़ कर किया है।अयोध्या नरेश ऋषभ राय और बाहुबली दो भाईयो में सत्ता संघर्ष हुवा। परन्तु,बाहुबली ने जैन मत का स्वीकार किया। काल पश्चात ऋषभ राय ने भी जैन मत का स्वीकार किया। चार तिर्थंकरो की जन्म भूमि अयोध्या ही रही है और विशेष यह की इनका एक ही वंश था,इक्ष्वाकु ! सूर्य वंशी आर्य क्षत्रिय !
 इक्ष्वाकु कुल की लिच्छवी शाखा में महात्मा बुध्द का जन्म हुवा। महात्मा बुध्द का सम्पूर्ण जीवन कौशल में बिता,जन्म कपिलवस्तु में,मुख्य निवास सरावती,धम्म प्रसार सारनाथ और महानिर्वाण कुशीनगर में हुवा जो कौशल प्रदेश में हुवा। भगवान बुध्द राजधानी अयोध्या आने का प्रमाण "दन्त धावन कुंड" है,किन्तु नगरी की दशा उस समय उन्नत नहीं थी।

 अलेक्झांडर पंजाब के रास्ते आया परन्तु १२ गणराज्यो ने आपसी भेद भुलाकर संयुक्त हमला कर लौटने को विवश किया.उसके पराजय को ध्यान में रखकर, "रोमन-कुषाण मिनेंडर ने वैष्णवो की एकात्मता पर प्रहार करने बुध्द मतावलंबी बनने का स्वांग किया। मगध सम्राट बृहद्रथ ने उसपर विश्वास किया और  मानवरक्त प्राशी रोमन सेना का आतंक आरम्भ हुवा। स्थानीय बुध्द प्रत्याक्रमण नहीं, सहायता करेंगे इस आत्मविश्वास के साथ मिनैडर ने वैष्णव मंदिर ध्वस्त करना आरम्भ कर दिया। बदरीनाथजी की मूर्ति नारदकुंड में फेंक दी।अयोध्या-मथुरा के जन्मस्थान घेरकर ध्वस्त किये।समस्त घटनाओ के लिए बृहद्रथ को दोषी मानकर उसके सेनापति पुष्यमित्रने बृहद्रथ की हत्या की और रोमनों को मार भगाकर मंदिर-स्तूप खड़े किये. दो बार अश्वमेध यज्ञ किया। मिराशी संशोधन मंडल को मंदिर शिलालेख में,"द्विरश्वमेध् याजिना:सेनापते: पुष्यमित्र्स्य षष्ठेन पुत्रेन केतनं कारितं ll "मिला है। उपरोक्त हार के कारण सभी हिन्दू अपने भेद नष्ट करके संगठीत होकर तीन महीने के संघर्ष के पश्चात शुंग वंशीय राजा द्युमत्सेन ने मिनेंडर को परास्त किया और मार गिराया। फिर भी कुषाणों के आक्रमण बारंबार होते रहे,इसलिए श्रीराम जन्मस्थान पर मंदिर बनाने में बाधा आती रही।आक्रान्ता मिनैडर पर "मिलिंदपन्ह"ग्रन्थ लिखनेवाले आचार्योने उसकी अस्थियोपर कब्ज़ा करने में प्राण गवाकर भी रोमनोंसे आधा हिस्सा लेकर स्तूप बनाए थे। इस्लामी शासनकाल में वहा बौध्द मतावलंबियो का कब्ज़ा ही नहीं था। 
 गढ़वाल नरेश गोविन्दचन्द्र शैव (१११४-११५४) ने शरणार्थी,घुसपैठियों पर "तुरष्कदंड" (निवासी कर) लगाया था। इन्होंने बुध्द मतावलंबी कुमारदेवी से विवाह कर भिक्षुओ को ६ गाव इनाम दिए,बर्मा के पेगोंग में महाबोधि प्रतिकृति मंदिर बनवाया.अपने सामंत कन्नोज नरेश नयचंद को ८४ कसोटी के गढ़वाली पत्थर भेजकर अयोध्या में श्रीराम जन्मस्थान पर विशाल मंदिर का निर्माण किया.जिसके प्रमाण भी १८ जुन १९९२ को उत्खनन में प्राप्त ३९ अवशेषोमें से एक २० पंक्ति शिलालेख से ज्ञात होता है.

मंदिर के सन्दर्भ-१)ऑस्ट्रेलियन मिशनरी जोसेफ टायफेंथालेर ने १७६६-१७७१ अयोध्या यात्रासे लौटकर १७८५ में लिखी हिस्ट्री अन जोग्राफी इंडिया के पृ.२३५-२५४ पर लिखे सन्दर्भ के अनुसार,"बाबरने राम जन्मभूमि स्थित मंदिर ध्वस्त कर मस्जिद बनवाने का प्रयास किया.उसमे मंदिर के मलबे से निकले ८४ कसोटी के स्तंभों का प्रयोग किया. मुसलमानों से लड़कर हिन्दू वह पूजा अर्चना करते है,परिसर में बने राम चबूतरा पर परिक्रमा की जाती है."
२)१६०८-१६११ भारत भ्रमण आये विल्यम फिंच की अर्ली ट्रेवल्स इन इंडिया के पृ.१७६ पर रामफोर्ट-रानिचंड का उल्लेख है.
३)गैझेटियर ऑफ़ दी टेरीटरिज अंडर गव्हर्मेंट ऑफ़ इस्ट इंडिया कं.लेखक एडवर्ड थोर्नटन पृ.क्र.७३९-४० पर १८५४ में लिखते है,"बाबर ने मस्जिद के लिए मंदिर गिराकर उसी के मलबे से १४स्तम्भ चुनकर लगवाए."
४)इनसाय्क्लोपीडिया ऑफ़ इंडिया १८५७ एडवर्ड बाल्फोअर,"राम जन्मस्थान,स्वर गडवार,माता का ठाकुर ३ मंदिर गिराकर मस्जिद कड़ी की गयी."
५)हिस्टोरिकल स्केच ऑफ़ फ़ैजाबाद ले. कार्नेजी १८७०,"राम मंदिर में काले से वजनदार स्तम्भ थे,उनपर सुन्दर नक्काशिकामकिया गया था,मंदिर गिराने के पश्चात मस्जिद में लगाया गया."
६)गैझिटियर ऑफ़ दी डाविन्स अवध -१८७७,बाबर ने १५२८ में मंदिर गिरक मस्जिद बनवाई
 ७)पर्शियन ग्रन्थ हदीका इ शहादा ले.मिर्जा जान १८५६ लखनोऊ पृ.७,"मथुरा,वाराणसी, अयोध्या में हिन्दू आस्था जुडी है,जिन्हें बाबर के आदेश से ध्वस्त कर मस्जिदे बनाई गयी."
८)ब्रिटिश नियुक्त जन्मभूमि व्यवस्थापक मौलवी अब्दुल करीम की ग़ुमइश्ते हालात इ अयोध्या में मान्य किया है की,मंदिरों को गिराकर मस्जिद बनायीं गयी थी.
९)अकबरनामा आइन ए अवध अब्दुल फाजल १५९८,अन्य                                                                    
मंदिर गिराने के पश्चात मस्जिद बनाते समय २ वर्ष युध्द जारी था हंसबर नरेश रणविजयसिंह,महारानी जयराजकुमारी उनके राजगुरु पं.देवीदीन पाण्डेय के बलिदान के बीच स्वामी महेशानंद साधु सेना लेकर लडे. मस्जिद बनाने जितनी दिवार दिनभर बन जाती रात में टूट जाती थी तब बाबर ने हिन्दू संतो की राय मांगी, और साधुओ के भजन पूजन का स्थान बनवाया,मीनार तोड़ दिए,वजू के लिए जलाशय नहीं बनवाया,द्वार पर सीता पाकस्थान लिखवाया,छत में चन्दन की लकड़ी लगवाई।
  १९४९ अयोध्या हिन्दू महासभा आंदोलन :- हिन्दू महासभा अंतर्गत कार्यरत श्रीरामायण महासभा के प्रधान महंतश्री रामचंद्रदास ,सं.मंत्री गोपालसिंह, संघटक श्री.अभिरामदास की सार्वजानिक सभा हनुमान गढ़ी पर संपन्न हुई.इस सभा में तय हुवा प.पू.श्री.वेदांती राम पदार्थदास जी की अध्यक्षता में का.कृ.९ को रामचरित मानस के १०८ नव्हान्न पाठ;समापन उ.प्र.हिं.म.स. अध्यक्ष महन्त् श्री दिग्विजयनाथ जी की उपस्थिति में,स्वामी करपात्रीजी महाराज,कांग्रेसी बाबा राघवदास,बड़ा स्थान महंत श्री.बिन्दुगाद्याचार्यजी,रघुवीर प्रसादाचार्यजी के भाषण प्रवचन हुए.वही मार्गशीर्ष शु.२ श्रीराम जानकी विवाह तिथि पर मानस के ११०८ नव्हान्न पाठ का संकल्प हुवा। निर्मोही अखाडा के महन्त् श्री बलदेवदास ,जन्मस्थान पुजारी तथा हिन्दू महासभा नगर कार्याध्यक्ष श्री.हरिहरदास ,पार्षद स्वर्गीय श्री परमहंस रामचंद्रदास,तपस्वियों की छावनी के अधिरिसंत दास,बाबा वृन्दावन दास,हिन्दू महासभा फ़ैजाबाद जिला अध्यक्ष ठा.गोपालसिंह विशारद जी ने सम्पूर्ण मंदिर परिसर साफ़,समतल किया.इसपर कब्रे उखाड़ फेंकने के आरोप हुए और न्यायालय में निर्दोष ! ११०८ से अधिक पाठकर्ता जन्मस्थान से हनुमान गढ़ी तक कतार में, इन में मुसलमान भी पाठ कर्ता थे.   पक्षकार हिन्दू महासभा ३/१९५० 

9 अप्रैल 2016

कन्हैय्या,बटवारे के पश्चात यह हिन्दुराष्ट्र है !

Press Note-


JNU फेम कन्हैय्या कॉन्स्ट्रटूशन क्लब में प्रेस वार्ता को सम्बोधित कर रहा था। {ABP News 9 April 2016} ये वामपंथी मनुवाद-ब्राह्मणवाद की बात करते है और राष्ट्रवाद का अर्थ उससे जोड़कर बताते है। मेरे विचार को वह ठीक नहीं लगा। इसलिए यहाँ लिख रहा हूँ।
१९२५ में संघ और वामपंथी दोनों का आगमन हुआ है। एक संगठन है और एक दल ! मात्र १९४६ के असेम्ब्ली चुनाव में नेहरु ने वामपंथियों का समर्थन नहीं माँगा। गुरूजी गोलवलकर का समर्थन माँगा था। इतना ही बताना ठीक होगा।
कन्हैय्या ,संघ पर आरोप लगा रहा है ,"संघ हिन्दुराष्ट्र स्थापित करना चाहता है और हिन्दुराष्ट्र का बेस ब्राह्मणवाद-मनुवाद है !"
कन्हैय्या को देश के सामाजिकता का ध्यान नहीं है। केवल अफु गोली खिलाकर जिसप्रकार सामाजिक-राष्ट्रिय भेद का विष वामपंथी खिलाते है उसका वह वमन है और कुछ नहीं। मनुवाद क्या है ? मनु प्रभु श्रीराम के पूर्वज थे और शासन व्यवस्था का सञ्चालन करने के लिए बनाया संविधान मनुस्मृती थी। ब्राह्मण का इसपर कोई अधिकार नहीं। ब्राह्मण देश का अतिअल्पसंख्य हिन्दू समाज है। इसलिए कन्हैय्या का आरोप गलत है।
कन्हैय्या ने,"हिन्दुराष्ट्र स्थापना की बात कही है !" वह अविश्वसनीय है। यदि ऐसा होता तो,१९४६ के चुनाव में मुस्लिम लीग और हिन्दू महासभा के बिच मतों का बटवारा होता और कांग्रेस तीसरे नंबर पर होती। विभाजन हुआ वह गुरूजी और नेहरु के सत्ता सहयोग के कारन। हिन्दू महासभा सत्ता में आती तो,अखण्ड हिन्दुराष्ट्र बना देखा होता। संघ हिन्दुराष्ट्र बनाने के इच्छुक होती तो,नेहरु-पटेल के इशारे पर "जनसंघ" का निर्माण हिन्दू महासभा तोड़कर क्यों किया होता ?

रही बात मुद्दे कि ,"अल्पसंख्या के आधारपर बटवारे के पश्चात यह हिन्दुराष्ट्र है ! क्योकि,यहाँ संविधानिक समान नागरिकता लागु नहीं है !"
राष्ट्रिय प्रवक्ता हिन्दू महासभा Pramod Pandit Joshi

1 अप्रैल 2016

श्रीराम लला निकट से दर्शन तथा तुलसी दल अर्पण- हिन्दू महासभा की गुहार !

 Press Note ;- 1 April 2016


श्रीराम नवमी को तथा हर माह की एकादशी को दर्शनार्थियों को श्रीराम लला ,रामकोट-अयोध्या में जन्मस्थान पर निकट से दर्शन तथा तुलसी दल अर्पण करने का सौभाग्य मिले ! सुप्रीम कोर्ट से पक्षकार हिन्दू महासभा की गुहार ! राष्ट्रिय प्रवक्ता हिन्दू महासभा प्रमोद पंडित जोशी
 * पर्शियन ग्रन्थ हदिका ए शहादा के लेखक मिर्झाजान ने सन १८५६ में पृष्ठ ७ पर लिखा है, "अयोध्या,मथुरा,वाराणसी में हिन्दुओ की आस्था जुडी हुई है।जिन्हें बाबर के आदेश से ध्वस्त करके मस्जिदे बनाई गयी।"
* ऑस्ट्रेलियन मिशनरी जोसेफ टायफेंथालेर सन १७६६-७१ के बिच अयोध्या-भारत भ्रमण कर वापस लौटा तब १७८५ में लिखे" हिस्ट्री एंड जिओग्राफी इंडिया" ग्रंथ में पृष्ठ २३५-२५४ पर लिखा है कि,"बाबर ने राम जन्मभूमि स्थित मंदिर ध्वस्त कर मस्जिद बनायीं ! उसमे मंदिर के स्तंभों का प्रयोग किया गया है।मुसलमानों के विरोध के पश्चात् भी हिन्दू वहा पूजा अर्चना के लिए आते है।इस परिसर में राम का पालना (राम चबुतरा) पर परिक्रमा की जाती है।देश के कोने कोने से यात्री आकर यहाँ धूमधाम से उत्सव मानते है।"
* हिस्टोरिकल स्केच ऑफ़ फ़ैजाबाद ग्रंथ के लेखक कार्नेजी सन १८७० में लिखते है,"राम जन्म मंदिर में काले पत्थर के वजनदार स्तंभ थे।उनपर सुंदर नक्काशिकाम किया गया था। उन्हें मंदिर गिराए जाने के पश्चात् मस्जिद में लगाया गया।" अनेक मुस्लिम विद्वानों के अनेक प्रमाण ग्रंथो में भी समान विचार है।